Pune Young woman's number leaked : पुण्यात धक्कादायक प्रकार! हॉटेलच्या QR कोडमधून तरुणीचा नंबर लीक, मध्यरात्री आले वैयक्तिक मेसेज

पुणे: डिजिटल युगात हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करणं आता सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र, हीच सोपी आणि सोयीची वाटणारी प्रक्रिया तुमच्या वैयक्तिक माहितीला किती मोठा धोका निर्माण करू शकते, याचा धक्कादायक अनुभव पुण्यातील एका तरुणीला आला आहे. पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) एका नामांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे ग्राहकांच्या गोपनीयतेचा आणि विशेषतः महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिका दत्ता नावाची तरुणी २८ एप्रिल रोजी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत एफसी रोडवरील (FC Road) एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. हॉटेलमध्ये पेपर मेन्यूऐवजी डिजिटल मेन्यूची सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे मेन्यू पाहण्यासाठी तिने टेबलावर ठेवलेला QR कोड स्कॅन केला. साधारणपणे ग्राहकांना डिजिटल मेन्यू उघडण्यासाठी मोबाईल नंबर टाकावा लागतो, त्याचप्रमाणे ऋषिकानेही आपला नंबर नोंदवला.


मात्र, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. त्याच रात्री उशिरा ऋषिकाला एका अनोळखी नंबरवरून वैयक्तिक मेसेज येऊ लागले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण वारंवार मेसेज येत असल्याने तिला संशय आला. संबंधित व्यक्ती तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिच्या लक्षात आलं.






हॉटेल कर्मचाऱ्यानेच चोरला नंबर?


ऋषिकाने या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, मेसेज करणारी व्यक्ती ही त्याच हॉटेलमध्ये काम करणारी कर्मचारी असल्याचं समोर आलं. आरोपानुसार, हॉटेलच्या QR कोड सिस्टीममध्ये ग्राहकांची माहिती उपलब्ध होत होती आणि त्याचाच गैरवापर करून संबंधित कर्मचाऱ्याने ऋषिकाचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर तिला वैयक्तिक मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या संपूर्ण प्रकारामुळे ऋषिकाला मोठा मानसिक धक्का बसला. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा अनुभव मांडला आणि ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता किती धोक्यात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले.



हॉटेल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह


या प्रकारानंतर ऋषिकाने हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हॉटेल प्रशासनाने तोंडी उत्तर देत त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचं सांगितलं. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत लेखी पुरावा किंवा माफीनामा देण्यास हॉटेलने नकार दिल्याचा दावा ऋषिकाने केला आहे.


दरम्यान, वाढत्या वादानंतर हॉटेलने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ग्राहकांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असंही हॉटेलने स्पष्ट केलं आहे.


QR कोड सिस्टीमवरून नवा वाद


या घटनेनंतर QR कोड आधारित डिजिटल मेन्यू सिस्टीमबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना मेन्यू पाहण्यासाठी मोबाईल नंबर देणे बंधनकारक असते. मात्र, हा डेटा नेमका कुठे साठवला जातो, कोणाला उपलब्ध असतो आणि त्याचा वापर कसा केला जातो, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना दिली जात नाही.


सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून काहींनी तर “पेपर मेन्यू नसलेल्या हॉटेलमध्ये जाणार नाही,” अशी भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती आता अधिक वाढली आहे.


महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न


पुण्यासारख्या शहरात अशा घटना समोर येणं चिंतेची बाब मानली जात आहे. महिलांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता हॉटेल, कॅफे किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी QR कोड स्कॅन करताना नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः कोणतीही वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी ती कितपत सुरक्षित आहे, याची खात्री करून घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध