Unauthorized Hawkers : टँक पाखाडी मार्ग आणि हाफिज अली खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार विक्रेत्‍यांवर BMC ची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ‘ई’ विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २१२ मधील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व हाफिज अली बहादूर खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार व्यावसायिक तसेच इतर मिळून सुमारे ४० अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. अनधिकृत बाकडे, स्‍टॉल्‍स, शेडस् यांच्‍यावर कारवाई करून अतिक्रमण निर्मूलन करण्‍यात आले.




उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. ‘ई’ विभागातील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व हाफिज अली बहादूर खान मार्ग परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या ‘ई’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन या विभागांनी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान अनधिकृत विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यात आली. पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. तसेच, रस्‍ता रहदारीसाठी मोकळा करण्‍यात आला.



१ जेसीबी यंत्र, ०३ वाहने, २० कामगारांच्‍या सहाय्याने केलेल्‍या या कारवाईवेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वरिष्ठ निरिक्षक, अनुज्ञापन निरिक्षक, वाहन व कर्मचारी तसेच परिरक्षण विभागाचे दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता, वाहन व कर्मचारी उपस्थित होते. नागपाडा पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mayor Ritu Tawde : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नालेसफाईसह रस्ते कामांची महापौरांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नद्या आणि लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे महानगरपालिका

 नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचे निलंबन

 भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा

Mumbai : मुंबईतील विविध यंत्रणांच्या ताब्यातील ६,१६० पाण्याच्या टाक्यांची तपासणीच झाली नसल्याचे उघड

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करता संयुक्त पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश बांधकामस्थळी ५ हजारांहून अधिक

BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने

Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच

मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार मुंबई : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील