BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने श्रीलंकेत होणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी १५ सदस्यीय India A अर्थात भारत अ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका तीन देशांच्या संघांमध्ये खेळली जाणार आहे. मालिकेला आयपीएल संपल्यानंतर ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी २३ वर्षीय तिलक वर्मा (Tilak Varma) याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. यात Sri Lanka A, Afghanistan A आणि India A या संघांचा समावेश आहे. या मालिकेतील सर्व सामने दांबुला येथे खेळले जाणार आहेत. या मालिकेनंतर Sri Lanka A आणि India A संघांदरम्यान दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने गॉल येथे खेळले जातील. या मालिकेसाठी BCCI ने युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे. संघात प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांसारख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.



वैभव सूर्यवंशीला संधी


आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केल्यापासून वैभव सूर्यवंशी हे नाव सातत्याने चर्चेत आहे. हा १५ वर्षीय खेळाडू सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात त्याने राजस्थानसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ४४० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने १८ सामने खेळले असून त्यात ६९२ धावा केल्या आहेत. त्याची इंडिया A संघात निवड झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.



तिरंगी मालिकेसाठी India A संघ –


तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी , रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी , निशांत सिंधू , हर्ष दुबे, सूर्याश शेडगे , प्रभुसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशगरा (यष्टीरक्षक), विपराज निगम , यश ठाकूर , युद्धवीर सिंग , अंशुल कंबोज आणि अर्शद खान .



तिरंगी मालिकेचे वेळापत्रक –


९ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
११ जून २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
१३ जून २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
१५ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
१७ जून २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
१९ जून २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ

Comments
Add Comment

 नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचे निलंबन

 भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा

Mumbai : मुंबईतील विविध यंत्रणांच्या ताब्यातील ६,१६० पाण्याच्या टाक्यांची तपासणीच झाली नसल्याचे उघड

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करता संयुक्त पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश बांधकामस्थळी ५ हजारांहून अधिक

Unauthorized Hawkers : टँक पाखाडी मार्ग आणि हाफिज अली खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार विक्रेत्‍यांवर BMC ची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ‘ई’ विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २१२ मधील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व

Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच

मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार मुंबई : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील

महाराष्ट्राला भारत-आफ्रिका सहयोगाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी

सिडकोतर्फे महत्त्वपूर्ण आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) प्रस्तावित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या