BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने श्रीलंकेत होणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी १५ सदस्यीय India A अर्थात भारत अ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका तीन देशांच्या संघांमध्ये खेळली जाणार आहे. मालिकेला आयपीएल संपल्यानंतर ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी २३ वर्षीय तिलक वर्मा (Tilak Varma) याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. यात Sri Lanka A, Afghanistan A आणि India A या संघांचा समावेश आहे. या मालिकेतील सर्व सामने दांबुला येथे खेळले जाणार आहेत. या मालिकेनंतर Sri Lanka A आणि India A संघांदरम्यान दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने गॉल येथे खेळले जातील. या मालिकेसाठी BCCI ने युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे. संघात प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांसारख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.



वैभव सूर्यवंशीला संधी


आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केल्यापासून वैभव सूर्यवंशी हे नाव सातत्याने चर्चेत आहे. हा १५ वर्षीय खेळाडू सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात त्याने राजस्थानसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ४४० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने १८ सामने खेळले असून त्यात ६९२ धावा केल्या आहेत. त्याची इंडिया A संघात निवड झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.



तिरंगी मालिकेसाठी India A संघ –


तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी , रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी , निशांत सिंधू , हर्ष दुबे, सूर्याश शेडगे , प्रभुसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशगरा (यष्टीरक्षक), विपराज निगम , यश ठाकूर , युद्धवीर सिंग , अंशुल कंबोज आणि अर्शद खान .



तिरंगी मालिकेचे वेळापत्रक –


९ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
११ जून २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
१३ जून २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
१५ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
१७ जून २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
१९ जून २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ

Comments
Add Comment

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे

Devendra Fadnavis : ५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा

Chief Minister Devendra Fadnavis : 'बेस्ट'च्या पुनरुज्जीवनासाठी 'भाडेपट्टा मॉडेल'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; २२ डेपोंच्या १२३ एकर जागेचा समावेश, पीपीपी तत्त्वावर होणार विकास मुंबई : मुंबईची

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रस्ताव फेटाळला मुंबई : भारताचे माजी

Aarey Colony : आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून