मुंबई: मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे माहुल येथील एसआरए प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु या वसाहतींमध्ये केवळ उदवाहनची समस्या नाही तर तेथील पायाभूत सेवा सुविधांचाही मोठ्याप्रमाणात अभाव आहे. त्यामुळे या वसाहतीमध्ये अशा सुविधा नसणे हे महापालिकेसाठी भुषणावह नसून या वसाहतीमध्ये तातडीने सर्वप्रकारच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी अशाप्रकारचे निर्देश स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांनी दिले.
मुंबई : असे म्हटले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य निरोगी राहते. याच दृष्टिकोनातून मुंबईकरांचे ...





