MNS Corporator : निधी नका देऊ, माझा प्रभाग दत्तक घ्या; मनसे नगरसेविकेने महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली विनंती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या स्तरावर महापौरांच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची सुधारणा करण्यात आल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनाच निधी दिल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे मनसेच्या नगरसेविकेने चक्क महापौरांना पत्र लिहून माझा प्रभाग आपण दत्तक घ्या. या प्रभागातील सर्व कामे आपणच करा आणि या प्रभागातील कामांचेही श्रेय आपणच घ्या. मला माझ्या प्रभागातील कामांचे श्रेय नको, पण किमान मला निवडून देणाऱ्या नागरिकांची सेवा सुविधांची कामे करून त्यांना दिलासा द्या,अशीच सूचना केली.



मनसेच्या प्रभाग क्रमांक ३८च्या नगरसेविका सुरेखा परब लोके यांनी महापौरांनी पत्र लिहून माझा प्रभाग दत्तक घेण्याची विनंती केली आहे. या पत्रामध्ये सुरेखा लोके यांनी असे नमुद केले आहे की, मुंबई महापालिकेने वर्ष २०२६-२७ साठी काही लाखांच्या विकासनिधीची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे, मुंबईतील अनेक वॉर्डांवर वर्ष २०२६-२७ साठी कोट्यवधींच्या विकासनिधीची खैरात करण्यात आली आहे. पण आपला प्रभाग ३८ हा झोपडपट्टीबहुल असून नागरिकांनी अपेक्षित असलेला विकास घडवण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. मात्र आमच्या वॉर्डासाठी अत्यल्प विकासनिधीची तरतूद झाल्यानंतर स्थानिकांच्या आशा-अपेक्षांची आणि गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेल्या विकासस्वप्नांची पूर्तता करायची तरी कशी, हा प्रश्न मला सतावत आहे.



मुंबईतल्या इतर वॉर्डातील नागरिक आणि आमच्या वॉर्डातील नागरिक हे मुंबईकरच आहेत. सर्व मुंबईकरांना समान वागणूक मिळणे अपेक्षित असतानाही विकासनिधीच्या माध्यमातून आमच्या वॉर्डातील नागरिकांना भेदभावपूर्ण वागणूक देणे निश्चितच भूषणावह नाही. नगरसेवक म्हणून निवडून देणाऱ्या मतदार- नागरिकांना दिली जाणारी ही दुय्यम वागणूक म्हणजे त्यांचा घोर अपमान आहे.



वॉर्डात गटारदुरुस्तीपासून शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंतच्या अनेक मूलभूत- महत्वाच्या कामांसाठी अनेक चाळींनी माझ्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे. दुर्दैवाने, २०२६-२७ वर्षात स्थानिकांना अपेक्षित असलेली कामे महापालिकेने तरतूद केलेल्या तुटपूंज्या निधीतून पूर्ण करणे मला शक्यच होणार नाही. म्हणूनच वाॅर्ड क्र. ३८ आपण स्वत: दत्तक घ्यावा! अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. या पत्रासोबत वॉर्डातील अत्यावश्यक- मूलभूत विकासकामांची यादीही त्यांनी सोबत जोडली आहे. त्यानुसार आपण मुंबईच्या महापौर म्हणून वॉर्ड क्र. ३८ मधील प्रलंबित विकासकामे पूर्ण करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा. प्रश्न विकासकामांचे श्रेय घेण्याचाच आहे ना? आपण संपूर्ण श्रेय घ्या! पण आमच्या वॉर्डातील नागरिकांच्या भावनांशी खेळू नका,असेही नमुद केले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे