Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा आमदारकीचा कार्यकाळ बुधवार, १३ मे रोजी संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत, '१४ मेपासून एका नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार' असल्याचे म्हटले आहे. आमदारकीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.


आपल्या भावना व्यक्त करताना मिटकरी म्हणाले की, "आजचा दिवस हा संघर्ष, वादळे आणि अनेक शिकवणींनी भरलेल्या एका मोठ्या राजकीय टप्प्याचा समारोप आहे. गेल्या सहा वर्षांत अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. टीका झाली, संघर्ष करावा लागला आणि अनेकदा एकटेपणाही वाट्याला आला; मात्र महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास हेच माझे बळ ठरले."



आपल्या राजकीय प्रवासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संधीचा उल्लेख करताना मिटकरी भावूक झाले. "दादांनी दिलेल्या संधीमुळेच मला राज्याच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. आज दादा आपल्यात नाहीत, हे कटू वास्तव पचवणे कठीण आहे. त्यांची अनुपस्थिती ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी आहे," अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.


नव्या इनिंगबाबत सूतोवाच

दुसरीकडे, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मिटकरी यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, "माझा संघर्ष अजून संपलेला नाही. उद्यापासून सुरू होणारा प्रवास अधिक संयमी, प्रगल्भ आणि महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाते सांगणारा असेल," असे म्हणत मिटकरी यांनी नव्या इनिंगचे सूतोवाच केले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस,