YouTuber Swanandi Sardesai : स्वानंदी सरदेसाईचा लग्नानंतरचा पहिला व्लॉग चर्चेत; “आता मी अकोल्याची सून...”

अकोला : 'ऐका ना...' म्हणत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी लोकप्रिय यूट्यूबर (YouTuber) स्वानंदी सरदेसाई हिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. १९ एप्रिल रोजी अतिशय साध्या, पारंपरिक आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती.



लग्नानंतर आता स्वानंदीनं नवरा विक्रांतसोबतचा पहिला व्लॉग (Vlog) चाहत्यांसाठी शेअर केला असून, या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या व्लॉगमध्ये तिनं लग्नानंतरच्या नव्या आयुष्याबद्दल, सासरच्या आठवणींबद्दल आणि नव्या नात्यांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.


कोकणातील संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनशैली आपल्या व्हिडिओतून जपणारी स्वानंदी आता कोकणची नव्हे तर अकोल्याची सून झाली आहे. लग्नानंतर ती नवरा विक्रांतसोबत अकोल्याला सासरी गेली होती. तिथे नवीन नातेवाईकांच्या भेटीगाठी, देवदर्शन, पूजा आणि इतर पारंपरिक कार्यक्रम पार पडल्याचं तिनं व्लॉगमध्ये सांगितलं.


स्वानंदी म्हणाली, “१९ एप्रिलला आमचं लग्न झालं. ठरवून नाही, पण स्वभावत: साधेपणा आवडत असल्यामुळे आम्ही अगदी जवळच्या आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.”



पुढे ती म्हणाली, “लग्नानंतर मी सासरी अकोल्याला गेले होते. तिथे सगळ्या नवीन नातेवाईकांना भेटणं, देवदर्शन, पूजा आणि विविध कार्यक्रम झाले. आता दोन-तीन दिवसांपूर्वी पुन्हा माहेरी कोकणात आले आहे. आता इकडची देवदर्शनं आणि इतर कार्यक्रम होणार आहेत.”


स्वानंदीच्या या साधेपणाने आणि तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीने चाहत्यांचं पुन्हा एकदा मन जिंकलं आहे.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा