'Deool Band-2' Movie : शिर्डीत प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय! ‘देऊळ बंद २’ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी

शिर्डी:  बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद - २’ (Deool Band-2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदा चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. “आता परीक्षा देवाची” अशी दमदार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात एका महिला शेतकऱ्याची कथा मांडण्यात आली आहे. ही महिला थेट स्वामींचीच परीक्षा घेताना दिसणार असून, चित्रपटातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या काळानुसार शेतीत बदल आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. हमीभाव, बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, कृषी सेवा केंद्रांची परिस्थिती अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरही चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.



शेतकऱ्यांच्या व्यथा, संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव मांडणाऱ्या ‘देऊळ बंद - २’ चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह संपूर्ण कलाकारांनी साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थान प्रशासनाकडून टीमचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी प्रवीण तरडे यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्याच मनात त्यांच्या विषयीचा आदर अधिक वाढला. ‘देऊळ बंद - २’ या चित्रपटातून होणारी कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी शिर्डीत केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा आणि बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत नवे पर्याय स्वीकारण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले, “सरकार बदलत जातात, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कायम राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. आत्महत्या करून काहीही साध्य होत नाही. काळानुसार शेतीची पद्धत बदलली पाहिजे. ‘देऊळ बंद - २’ हा सिनेमा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. या चित्रपटाची कमाईही आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहोत.”


दरम्यान, ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल काही वर्षांनंतर ‘देऊळ बंद - २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट २१ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Smriti & Palash controversy : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या प्रकरणात नव्हे वळण ; पलाश मुच्छलला होणार अटक ?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीत क्षेत्रातील गायक पलाश मुच्छल(Palash

Lock Up 2 : गोविंदासमोर सुनीता आहुजाची भावनिक एक्झिट; 'लॉक अप २'मध्ये घडला अनपेक्षित क्षण

Lock Up 2 : 'लॉक अप २' (Lock Up 2 ) या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सुनीता आहुजाचा (Sunita Ahuja) प्रवास संपला असून, तिच्या एक्झिटदरम्यान

Medha Manjrekar : अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची कॅन्सरशी झुंज, शेअर केली भावुक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत

Rinku Rajguru Album Song : ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचा नवा अंदाज; पहिलं अल्बम साँग ‘बाप विठुराया’ प्रदर्शित

मुंबई : ‘सैराट’ (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Aamir Khan 3 Wives : १०० कोटींची गुंतवणूक, तिन्ही पत्नींसाठी स्वतंत्र मजले; आमिर खानच्या नव्या घराची चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तिसरं लग्न

'Deool Band 2' Marathi Movie : 'देऊळ बंद २'ला शाहरुख खानची साथ; ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) चर्चेत असलेल्या ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2) या चित्रपटाला बॉलिवूडचा (Bollywood) ‘किंग