मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार आणि अप्रतिम अभिनयाचा अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचे नाव आजही चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. 'शोले', 'आंधी' आणि 'अंगूर' यांसारख्या अजरामर चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, ज्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. मात्र, संजीव कुमार आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा खूप मोठ्या असणाऱ्या भूमिका चित्रपटांमध्ये का साकारायचे, यामागचे एक गूढ आणि अंगावर काटा आणणारे कारण आता समोर आले आहे.
पीएमएनआरएफमधून मृतांच्या कुटुंबीयांना ₹2 लाख, जखमींना ₹50 हजार ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी येथे कोहिनूर इमारतीचा भाग कोसळून झालेल्या ...
सचिन पिळगावकरांचा धक्कादायक खुलासा
प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकताच एका मुलाखतीत संजीव कुमार यांच्याशी असलेल्या घट्ट मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला. संजीव कुमार यांनी एका भविष्यकाराने वर्तवलेल्या भाकिताबद्दल सचिन यांना सांगितले होते. एका हस्तरेषा तज्ज्ञाने त्यांचे आयुष्य फार मोठे नाही आणि ते कधीच म्हातारपण पाहू शकणार नाहीत, अशी भविष्यवाणी वर्तवली होती.
याबाबत बोलताना संजीव कुमार यांनी सचिन यांना सांगितले होते की, "जे आयुष्य प्रत्यक्षात दीर्घकाळ जगायला मिळणार नाही, तो म्हातारपणाचा टप्पा कमीत कमी पडद्यावर तरी अनुभवावा." याच इच्छेपोटी ते आपल्या वयापेक्षा मोठ्या आणि प्रौढ व्यक्तींच्या भूमिका पडद्यावर साकारत असत.
अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना मुंबई : भिवंडी येथील इमारत दुर्घटना अत्यंत ...
निधनापूर्वीची ती अखेरची भेट
संजीव कुमार यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी सचिन पिळगावकर एका डबिंग सेशनदरम्यान त्यांना भेटले होते. त्यावेळी संजीव कुमार यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी घरी बोलावले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे सचिन दुपारी अडीच वाजता त्यांच्या घरी पोहोचले. तेव्हा ते बेडरूममधील बाथरुममध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. साधारण अर्धा तास वाट पाहिल्यानंतर सचिन यांना काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली.
चौकशी केल्यानंतर समजले की, संजीव कुमार यांची प्रकृती अचानक खालावली असून डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे. आदल्या रात्री ते पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत शूटिंग करून घरी परतले होते आणि त्यांना उलट्याही झाल्या होत्या. प्रकृती ठीक नसतानाही ते इतका उशिरापर्यंत काम करत असल्यामुळे त्यांना ओरडणार असल्याचे सचिन यांनी मनात ठरवले होते, कारण संजीव कुमार हे त्यांचे मार्गदर्शक आणि मित्र होते.
आयकरदाते असल्याने कारवाई; राज्य सरकारचे १ हजार ८८१ कोटी रुपये वाचले मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती ...
अखेर भविष्य खरे ठरले
बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि उपस्थित लोक आत जाण्यास घाबरत होते. अशात सचिन यांनी हिंमत करून दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संजीव कुमार बेडरूममधील कारपेटवर मृत अवस्थेत पडले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरवली होती. हस्तरेषा तज्ज्ञाने वर्तवलेले ते गूढ भाकीत अखेर सत्य ठरले.