Rahul Dravid : टी-२० मध्ये फलंदाजी खूप पुढे; गोलंदाज मागे पडत आहेत

IPL 2026 : टीम इंडियाचे माजी मुख्य कोच आणि दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी टी-२० क्रिकेटमधील बदलत्या खेळ पद्धतीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या मते, टी-२० क्रिकेटमुळे फलंदाजांची कामगिरी झपाट्याने सुधारत आहे. गोलंदाज मात्र त्या तुलनेत मागे पडत आहेत.राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२३ जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. सध्या गोलंदाजांबाबत केलेल्या त्यांच्या विधानामुळे क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.



नेमकं काय म्हणाले राहुल द्रविड?


राहुल द्रविड यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, प्रियांश आर्य आणि अभिषेक शर्मा यांसारख्या फलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्यांच्या मते, फलंदाज आता मैदानाच्या सर्व भागात मोठे फटके आणि षटकार मारण्याची क्षमता दाखवत आहेत. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. पण भविष्यात गोलंदाजही आपल्या खेळात बदल करतील आणि पुन्हा एकदा गोलंदाजीचे वर्चस्व निर्माण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कसोटी क्रिकेटमध्ये एकेकाळी फलंदाज कधी आक्रमक तर कधी संथ खेळून सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकायचे. आता गोलंदाज कसोटी सामन्यांवर प्रभाव टाकू लागल्याचे दिसत आहे. अनेक कसोटी सामन्यांमध्ये ३० - ४० विकेट्स जाऊ लागल्या आहेत. हळू हळू टी-२० क्रिकेटमध्येही फलंदाजांप्रमाणेच गोलंदाज प्रभावी ठरतील, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला.


युरोपियन टी-२० लीगमध्ये संघाचे मालक


राहुल द्रविड नुकतेच युरोपियन टी२० प्रीमियर लीग मधील एका संघाचे मालक झाले आहेत. त्यांनी डब्लिन गार्डियन्स या संघाची फ्रँचायझी घेतली आहे. या संघाचे नेतृत्व भारताचे माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन करणार आहेत.

Comments
Add Comment

Axar Patel : दिल्लीला मोठा धक्का ! अक्षर पटेलला झाला एवढा मोठा दंड

मुंबई : अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली होती, मात्र सलग पराभवांनंतर त्यांचे

South Africa : वर्ल्ड कप खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली मागे, टी- २० वर्ल्ड कप खेळणार

लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १२ जूनपासून होणार

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली, कोणत्या संघाला किती गुण पाहिजेत , जाणून घेऊया...

PlayOff Race : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५५ सामने झाले आहेत. अद्याप एकही संघ

Tim David : टीम डेव्हिडवर बीसीसीआयची कठोर करवाई, हंगामातून बॅन होण्याची शक्यता !

BCCI ACTION : आयपीएल २०२६ मध्ये १० मे रोजी आरसीबी आणि मुंबईचा सामना झाला. या सामन्यात आरसीबीने अखेरच्या षटकात मुंबईचा २

SRH VS GT : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध गुजरातमध्ये रंगणार थरारक सामना ! निकालाचा परिणाम आरसीबीवर ...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये ५६ वा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स

IPL 2026 मध्ये वाढली Playoff ची चुरस

धरमशाला : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५४ साखळी सामने (लीग मॅच) झाले आहेत. धरमशाला येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब