मुंबई : अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली होती, मात्र सलग पराभवांनंतर त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला होता. पण ११ मे रोजी झालेल्या पंजाब विरूद्धच्या सामन्यात दिल्लीने दमदार विजय मिळवला आणि आव्हान जीवंत ठेवले. मात्र बीसीसीआयने या सामन्यानंतर कर्णधार अक्षर पटेलवर दंड ठोठावला आहे.या सामन्यात अक्षर पटेलने गोलंदाजी केली नाही पण फलंदाजीत मोठे योगदान दिले. पंजाबने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. संघाने सुरुवातीलाच झटपट विकेट्स गमावल्या. मात्र अक्षर पटेलने डेव्हिड मिल्लर सोबत उत्तम भागीदारी केली. त्याने ३० चेंडूंमध्ये ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. यानंतर आशुतोष शर्माने आक्रमक फलंदाजी केली आणि दिल्लीने विजय मिळवला.
लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १२ जूनपासून होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ...
बीसीसीआयने दंड का ठोठावला ?
पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेट प्रकरणी नियमानुसार दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनला जबाबदार ठरवून बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली. अक्षर पटेलला बीसीसीआयने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला.बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल २०२६ मध्ये प्रत्येक संघाला आपली २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागतात, विलंब झाल्यास दंड आकारण्यात येतो. पंजाब विरूद्धच्या सामन्यात अक्षरने पूर्ण २० षटके वेगवान गोलंदाजांनाच संधी दिली. यामुळे वेळ वाया गेला आणि बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली.
पंजाब किंग्स विरुद्धच्या विजयानंतर दिल्ली प्लेऑफ शर्यतीत कायम आहे. दिल्लीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि धावगतीत सुधारणा करावी लागेल. तसेच प्रतिस्पर्धी संघांची कामगिरी वाईट होईल अशीही आशा बाळगावी लागेल. यामुळे दंड झाला तरी प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर अक्षरला झालं गेलं विसरून संघाचं नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल आणि नियमांचे पालन करावे लागेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे