Nashik Heatwave : उन्हाचा तडाखा वाढला… जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’

Nashik Heatwave : राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढू लागलेला उन्हाचा तडाखा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी तीव्र झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने कहर केला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्येही उष्ण लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Nashik city's temperature hits 42 degrees Celsius'



नाशिक शहराचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर


गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) उन्हाचा चांगलाच चटका बसत असून, सोमवारी (दि.११) शहराचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. या मोसमातील हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान (Temperature) ठरले आहे. रात्रीचे किमान तापमानही २६ अंशांवर असल्याने नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय. (Nashik city's temperature hits 42 degrees Celsius)



ग्लोबल वॉर्मिंगचा नाशिकलाही फटका


नाशिकच्या हवामान इतिहासात (Climate History) २०११ पर्यंत तापमानाने कधीही ४२ अंशांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा (Global warming) फटका नाशिकलाही बसत आहे. २८ एप्रिल २०१९ रोजी ४२.८ अंश अशी सर्वोच्च नोंद झाली होती. सोमवारची ४२ अंशांची नोंद ही गेल्या काही वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पातळी ठरली आहे. उन्हाच्या (Summer) तीव्रतेमुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (Mumbai Regional Meteorological Centre)नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) १३ मे पर्यंत येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.



शिवडीत ४६ अंश नोंद


निफाड तालुक्यातील शिंवडी येथे तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांसह शेतीला मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पालेभाज्या जळून खाक होत असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. कसबे सुकेणे परिसरातही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात झालेली वाढआणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ६० ते ६५ पूर्व रेखांशावर निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरत आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून