Nashik Heatwave : उन्हाचा तडाखा वाढला… जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’

Nashik Heatwave : राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढू लागलेला उन्हाचा तडाखा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी तीव्र झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने कहर केला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्येही उष्ण लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Nashik city's temperature hits 42 degrees Celsius'



नाशिक शहराचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर


गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) उन्हाचा चांगलाच चटका बसत असून, सोमवारी (दि.११) शहराचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. या मोसमातील हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान (Temperature) ठरले आहे. रात्रीचे किमान तापमानही २६ अंशांवर असल्याने नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय. (Nashik city's temperature hits 42 degrees Celsius)



ग्लोबल वॉर्मिंगचा नाशिकलाही फटका


नाशिकच्या हवामान इतिहासात (Climate History) २०११ पर्यंत तापमानाने कधीही ४२ अंशांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा (Global warming) फटका नाशिकलाही बसत आहे. २८ एप्रिल २०१९ रोजी ४२.८ अंश अशी सर्वोच्च नोंद झाली होती. सोमवारची ४२ अंशांची नोंद ही गेल्या काही वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पातळी ठरली आहे. उन्हाच्या (Summer) तीव्रतेमुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (Mumbai Regional Meteorological Centre)नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) १३ मे पर्यंत येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.



शिवडीत ४६ अंश नोंद


निफाड तालुक्यातील शिंवडी येथे तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांसह शेतीला मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पालेभाज्या जळून खाक होत असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. कसबे सुकेणे परिसरातही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात झालेली वाढआणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ६० ते ६५ पूर्व रेखांशावर निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना