Nashik Heatwave : राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढू लागलेला उन्हाचा तडाखा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी तीव्र झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने कहर केला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्येही उष्ण लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Nashik city's temperature hits 42 degrees Celsius'
Nashik : नाशिक शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील आडगाव शिवारातील (Aadgaon Area) धात्रक फाटा येथे एका २३ वर्षीय कंपनी कामगाराने राहत्या घरी आत्महत्या ...
नाशिक शहराचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर
गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) उन्हाचा चांगलाच चटका बसत असून, सोमवारी (दि.११) शहराचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. या मोसमातील हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान (Temperature) ठरले आहे. रात्रीचे किमान तापमानही २६ अंशांवर असल्याने नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय. (Nashik city's temperature hits 42 degrees Celsius)
Nashik TCS Case :टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित्त निदा खानच्या अटकेनंतर अनेक गौप्यस्फोट समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ...
ग्लोबल वॉर्मिंगचा नाशिकलाही फटका
नाशिकच्या हवामान इतिहासात (Climate History) २०११ पर्यंत तापमानाने कधीही ४२ अंशांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा (Global warming) फटका नाशिकलाही बसत आहे. २८ एप्रिल २०१९ रोजी ४२.८ अंश अशी सर्वोच्च नोंद झाली होती. सोमवारची ४२ अंशांची नोंद ही गेल्या काही वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पातळी ठरली आहे. उन्हाच्या (Summer) तीव्रतेमुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (Mumbai Regional Meteorological Centre)नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) १३ मे पर्यंत येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ची (Raja Shivaji) बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही कायम आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने अवघ्या ...
शिवडीत ४६ अंश नोंद
निफाड तालुक्यातील शिंवडी येथे तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांसह शेतीला मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पालेभाज्या जळून खाक होत असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. कसबे सुकेणे परिसरातही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात झालेली वाढआणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ६० ते ६५ पूर्व रेखांशावर निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरत आहे.






