IPL 2026 Mumbai Indians : तिलक वर्माच्या एका चुकीने मुंबईचं स्वप्न भंगलं! नमन धीरसोबतच्या गैरसमजामुळे सामना फिरला, MI प्लेऑफमधून बाहेर

मुंबई : पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामाचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला. रायपूरमध्ये झालेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने अंतिम चेंडूवर २ विकेट्स राखून विजय मिळवत मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकलं. आयपीएल २०२६ मधील ५४ व्या सामन्यात आरसीबीने अखेरच्या क्षणी सामना हिसकावत मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.


प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी मारा करत सामना पूर्णपणे नियंत्रणात ठेवला होता. मात्र, १८ व्या षटकात घडलेल्या एका चुकीने अख्ख्या सामन्याचं चित्र बदललं.



आरसीबीसाठी क्रुणाल पांड्या एकहाती लढत होता. अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका मारला. सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या नमन धीरने अप्रतिम प्रयत्न करत चेंडू मैदानात ढकलला. त्याच्याच जवळ तिलक वर्मा उभा होता. पण नमनचा पाय बाउंड्री रोपला लागला असावा, असा समज झाल्याने तिलकने झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही.


मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की नमनचा पाय रोपला स्पर्श झालाच नव्हता. म्हणजेच तिलकने योग्यवेळी प्रतिक्रिया दिली असती तर क्रुणाल पांड्या त्याच क्षणी बाद झाला असता. हा गैरसमज पाहून नमन धीरही संतापलेला दिसला.


जीवदान मिळाल्यानंतर क्रुणाल पांड्याने त्याच षटकात सलग दोन षटकार ठोकत सामना आरसीबीच्या बाजूने फिरवला. या अतिरिक्त १२ धावाच अखेरीस मुंबईसाठी महागात पडल्या. नंतर तिलक वर्माने क्रुणालचा शानदार झेल घेतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.



शेवटच्या षटकात मुंबईसमोर १५ धावा वाचवण्याचं आव्हान होतं. मात्र, पहिल्यांदाच अंतिम षटक टाकणाऱ्या राज अंगद बावाला दबाव झेपला नाही. त्याने वाइड आणि नो-बॉलसह तब्बल ५ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीला विजयाचा मार्ग सोपा झाला.


अखेरीस शेवटच्या चेंडूवर रासिख सलामने धाव घेत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. जर तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यात तो गैरसमज झाला नसता, तर सेट झालेला क्रुणाल पांड्या त्याचवेळी बाद झाला असता आणि आरसीबीसमोर शेवटच्या षटकात जवळपास २५ धावांचं कठीण लक्ष्य उभं राहिलं असतं.


मुंबई इंडियन्सच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिलक वर्माच्या त्या एका चुकीवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, हा क्षणच मुंबईच्या हंगामाचा टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Yashasvi Jaiswal : भारताची अफगाणिस्तानवर 9 विकेट्ने मात, एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली

यशस्वी जैस्वालची ११० धावांची नाबाद खेळी -प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक पाच बळी चेन्नई : यशस्वी जैस्वालच्या

Narcotics seized : पुण्याच्या वाकड येथे फूड डिलिव्हरी बॉयकडून अंमली पदार्थ जप्त

पुणे : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला एमडी (मॅफेड्रॉन) पावडरची विक्री करताना वाकड पोलिसांनी अटक

Big Opportunity: फुटबॉल टर्फ उभारणीचा खर्च, तांत्रिक निकष आणि नियोजनाचा मास्टर प्लॅन

Current Situation : सध्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत फुटबॉल टर्फ (Football Turf) व्यवसायाची क्रेझ वेगाने वाढत आहे. फिटनेस

IPL 2027 : रिषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ? कुलदीप यादव लखनऊ मध्ये !आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा ?

Mumbai : आयपीएल २०२७ (IPL 2027) पूर्वी ट्रेडमुळे चर्चा रंगल्या आहेत. भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा

FIFA WORLDCUP 2026 : नवा नियम ठरला पॅराग्वेच्या खेळाडूला महागात! मिगेल अल्मिरॉनला दाखवले थेट रेड कार्ड

Santa Clara, California : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एका नवीन आणि कडक नियमामुळे पॅराग्वेचा मिडफिल्डर मिगेल अल्मिरॉन चर्चेत आला

FIFA World Cup 2026 : 10 खेळाडूंनीच केला पराक्रम! तुर्कीला हरवत पॅराग्वेची मोठी कामगिरी

Santa Clara, California: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या थरारक सामन्यात पॅराग्वेने १० खेळाडूंसह खेळून तुर्कीचा