IPL 2026 Mumbai Indians : तिलक वर्माच्या एका चुकीने मुंबईचं स्वप्न भंगलं! नमन धीरसोबतच्या गैरसमजामुळे सामना फिरला, MI प्लेऑफमधून बाहेर

मुंबई : पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामाचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला. रायपूरमध्ये झालेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने अंतिम चेंडूवर २ विकेट्स राखून विजय मिळवत मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकलं. आयपीएल २०२६ मधील ५४ व्या सामन्यात आरसीबीने अखेरच्या क्षणी सामना हिसकावत मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.


प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी मारा करत सामना पूर्णपणे नियंत्रणात ठेवला होता. मात्र, १८ व्या षटकात घडलेल्या एका चुकीने अख्ख्या सामन्याचं चित्र बदललं.



आरसीबीसाठी क्रुणाल पांड्या एकहाती लढत होता. अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका मारला. सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या नमन धीरने अप्रतिम प्रयत्न करत चेंडू मैदानात ढकलला. त्याच्याच जवळ तिलक वर्मा उभा होता. पण नमनचा पाय बाउंड्री रोपला लागला असावा, असा समज झाल्याने तिलकने झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही.


मात्र रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की नमनचा पाय रोपला स्पर्श झालाच नव्हता. म्हणजेच तिलकने योग्यवेळी प्रतिक्रिया दिली असती तर क्रुणाल पांड्या त्याच क्षणी बाद झाला असता. हा गैरसमज पाहून नमन धीरही संतापलेला दिसला.


जीवदान मिळाल्यानंतर क्रुणाल पांड्याने त्याच षटकात सलग दोन षटकार ठोकत सामना आरसीबीच्या बाजूने फिरवला. या अतिरिक्त १२ धावाच अखेरीस मुंबईसाठी महागात पडल्या. नंतर तिलक वर्माने क्रुणालचा शानदार झेल घेतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.



शेवटच्या षटकात मुंबईसमोर १५ धावा वाचवण्याचं आव्हान होतं. मात्र, पहिल्यांदाच अंतिम षटक टाकणाऱ्या राज अंगद बावाला दबाव झेपला नाही. त्याने वाइड आणि नो-बॉलसह तब्बल ५ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीला विजयाचा मार्ग सोपा झाला.


अखेरीस शेवटच्या चेंडूवर रासिख सलामने धाव घेत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. जर तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यात तो गैरसमज झाला नसता, तर सेट झालेला क्रुणाल पांड्या त्याचवेळी बाद झाला असता आणि आरसीबीसमोर शेवटच्या षटकात जवळपास २५ धावांचं कठीण लक्ष्य उभं राहिलं असतं.


मुंबई इंडियन्सच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिलक वर्माच्या त्या एका चुकीवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, हा क्षणच मुंबईच्या हंगामाचा टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : इराण विश्वचषकात खेळणार, पण यजमानांसमोर ठेवल्या १० अटी

इराण फुटबॉल महासंघाने पुष्टी केली की, राष्ट्रीय संघ २०२६ च्या फिफा विश्वचषकात सहभागी होईल. गेल्या काही

IPL 2026 GT vs RR : राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर गुजरातची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

मुंबई : शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकांच्या आणि राशिद खानच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गुजरात

Vaibhav Sooryavanshi : आयपीएलच्या दिग्गजांमध्ये वैभवचे वर्चस्व, केला नवा विश्वविक्रम

जयपूर: आयपीएल २०२६ मध्ये गुजरात आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या लढतीत जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून

Axar Patel : दिल्लीचा कर्णधार बदलणार, अक्षर पटेलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, केएल राहुलबाबत विचार

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधून जवळपास बाहेर झाली आहे. दिल्लीचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. हे

FIFA World Cup 2026 : केटी पेरी-शकीराचा धमाका! विश्वचषक उद्घाटन सोहळा होणार सुपरहिट एंटरटेनमेंट शो

फिफा वर्ल्ड कप २०२६ (2026 FIFA World Cup) च्या उद्घाटन सोहळ्याची रंगत आता अधिकच वाढली आहे. जागतिक पॉप स्टार केटी पेरी (Katy Perry) हिने