नवी दिल्ली : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५१ साखळी सामने खेळून झाले आहेत. सध्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबा पहिल्या, पंजाब किंग्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, राजस्खान रॉयल्स चौथ्या, गुजरात टायटन्स पाचव्या, चेन्नई सुपरकिंग्स सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या, दिल्ली कॅपिटल्स आठव्या, मुंबई इंडियन्स नवव्या आणि लखनऊ सुपर जायंट्स दहाव्या स्थानावर आहे. आयपीएलचे आणखी १९ साखळी सामने व्हायचे आहेत. यानंतर प्ले ऑफ राउंड सुरू होणार आहे. याआधीच आयपीएल तिकिटांच्या काळ्याबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी पिक्चर्स ने ...
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अँटी रॉबरी अँड स्नॅचिंग सेल अर्थात एआरएससीने आयपीएल तिकिटांच्या काळ्याबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून ५४ सामन्यांच्या तिकिटांशी संबंधित माहिती तसेच ३३ मोफत पास (कॉम्प्लिमेंटरी पास) आणि २५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. आणखी काही जणांची धरपकड होण्याची शक्यता आहे.
IPL 2026 : आज आयपीएलमध्ये जयपुरच्या सवाई मांनसिक स्टेडियमवर ५० वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यत होणार आहे. आयपीएल २०२६ ...
आयपीएल सामन्यांच्या प्रीमियम तिकिटांची आणि मोफत पासची चढ्या दराने बेकायदेशीर विक्री सुरू होती. ही टोळी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बुकी आणि गुंडांच्या मदतीने उलाढाल करत होती. विक्रीसाठी उपलब्ध नसलेले मोफत पास बेधडक चढ्या दराने विकले जात होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज नवीन वादांना तोंड फुटत आहे. गेल्या ...
याआधी आयपीएलचा अंतिम सामना बंगळुरू येथून अहमदाबाद येथे स्थलांतरित केल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी जाहीर केले. मोफत तिकिटांच्या मागणीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली. यानंतर सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय झाल्याचे सैकिया म्हणाले. गतविजेत्या संघाच्या व्यवस्थापनाला त्यांच्या शहरात आयपीएल प्लेऑफमधील एका सामन्याचे तसेच अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी विनंती करण्याचा विशेषाधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या व्यवस्थापनाने बंगळुरूत अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी नियोजन सुरू केले होते. बीसीसीआयने अंतिम सामना बंगळुरूत खेळवण्याची तयारी सुरू केली होती. पण अचानक मोफत तिकिटांच्या मागणीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली. कर्नाटक सरकारसाठीच ७०० मोफत पाससह एकूण दहा हजार अतिरिक्त तिकिटांची मागणी झाली. यानंतर सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सैकिया यांनी सांगितले.
BCCI NEW RULES: आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. यात आता आयपीएलमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआयने) सर्व ...
आता क्वालिफायर वन २६ मे रोजी हिमाचल प्रदेशमधील धरमशालात तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर टू हे दोन सामने अनुक्रमे २७ आणि २९ मे रोजी राजस्थानमध्ये न्यू चंदिगडच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये, होणार आहेत. अंतिम सामना ३१ मे रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद येथील मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.