- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा, रुग्णालये, ...
प्रादेशिक हवामान केंद्राने रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच सोमवार ३ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तर मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवार ५ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ...
ज्या विभागांना पावसाचा इशारा दिला आहे तिथल्या नागरिकांना विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. यंदा अल निनोमुळे पावसाचं आगमन उशिरा झाले. पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम झाला. राज्यात अनेक ठिकाणी पाणीकपात जाहीर करण्यात आली. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. पण हळू हळू पावसाचे आगमन झाले आणि परिस्थिती हळू हळू नियंत्रणात येऊ लागली. पण स्थिती अद्याप पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपात पूर्ण रद्द करावी किंवा कसे याबाबतचा निर्णय प्रशासन घेणार आहे.