मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला नवा पर्याय

 नेरळ-शिरूर कॉरिडॉरला मंजुरी; १३३ किलोमीटर चौपदरी महामार्ग खासगी भागीदारीतून साकारणार


मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) वाढता ताण कमी करण्यासह मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून मुंबईकडे होणारी अवजड वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने निर्णयाक पाऊल उचलले आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ ते पुणे जिल्ह्यातील शिरूर या १३३.७१ किलोमीटर लांबीच्या नवीन चौपदरी महामार्गाच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. खासगी भागीदारीतून (पीपीपी) साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे पुणे-शिरूर रस्त्यावरील दीर्घकालीन वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून, जेएनपीटी बंदर आणि मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने राज्यातील सर्व प्रमुख कॉरिडॉर या केंद्राशी जलदगतीने जोडणे ही शासनाची प्राथमिकता आहे. सध्या मराठवाडा आणि अहिल्यानगर भागातील वाहतूक प्रामुख्याने पुणे शहरामार्गे मुंबईला जाते, ज्याचा थेट परिणाम पुणे-शिरूर पट्ट्यातील वाहतूक व्यवस्थेवर होऊन मोठी कोंडी निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नेरळ-बांद्रे-पाईट-शिरोली-पाबळ-मलठण-शिरूर अशा नवीन मार्गाची आखणी करण्यात आली आहे. हा मार्ग पूर्णपणे चौपदरी असेल आणि त्यासाठी आवश्यक जमीन संपादनाकरिता सुमारे १ हजार २२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ही प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबवण्यात येणार असून, त्यातील गुंतवणुकीचा परतावा मिळवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला ३१ जुलै २०१४ च्या धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर (टोल) वसुलीचे हक्क प्रदान केले जातील. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मान्यतेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित पद्धतीनुसार या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पार पडणार आहे.


फायदा काय होणार?


हा नवीन जलदगती वाहतूक कोंडीवरील उपाय ठरण्यासह या मार्गातील शिरोली, पाबळ, मलठण यांसारख्या ग्रामीण भागांतील औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना देईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पूर्वेकडून सह्याद्री ओलांडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतुकीला नाशिक आणि पुणे मार्गाव्यतिरिक्त एक सक्षम आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार असल्याने राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची