Mrunmayee kadam : ‘बाप कमावतोय तर कामाची गरज काय?’ ट्रोलरला भाऊ कदमांच्या लेकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय विनोदवीर भाऊ कदम हे प्रेक्षकांचे कायमच आवडते कलाकार राहिले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘फू बाई फू’सारख्या कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अभिनयाइतकंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम ही देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे व्हिडिओ, व्लॉग आणि पोस्ट्स नेहमी चर्चेत असतात. भाऊ कदम यांच्याप्रमाणेच मृण्मयीला देखील प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळतं.



काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने परदेशातून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना आत्मनिर्भर होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे परदेशात शिक्षण घेत असतानाच ती कॅफेमध्ये काम करत होती. अभ्यास आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी सांभाळत तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे फोटो Instagram वर शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये ती आई-वडिलांसोबत दिसत होती. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया देत ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.


या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी मृण्मयीने स्वतः एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, “मी Instagram वर माझी पोस्ट पाहिली आणि त्यानंतर त्या पोस्टखालील कमेंट्स वाचल्या. मुली बाहेर जाऊन शिकत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, ग्रॅज्युएट होत आहेत, पुढे जात आहेत… त्यामुळे काही लोकांचा मेल इगो हर्ट होतो.”







यानंतर तिने काही ट्रोलिंग कमेंट्स वाचून दाखवल्या. एका यूजरने कमेंट केली होती, “पैसा असेल तर कुठेही उच्च शिक्षण घेता येतं.” यावर उत्तर देताना मृण्मयी म्हणाली, “हो, पैसा महत्त्वाचा असतोच. पण मेहनत नावाची गोष्टही असते. देवाने आपल्याला हातपाय दिले आहेत, मग कायम आई-वडिलांच्या पैशांवरच अवलंबून का राहायचं? स्वतः मेहनत करून काहीतरी मिळवण्यात वेगळीच समाधानाची भावना असते.”


त्यानंतर तिने आणखी काही कमेंट्स वाचल्या. एका व्यक्तीने लिहिलं होतं, “शिक्षणासाठी पैसा महत्त्वाचा असला तरी बुद्धीही लागते.” यावर मृण्मयीने उत्तर देताना म्हटलं, “जर पैशांनीच सगळं काही मिळत असतं, तर प्रत्येक श्रीमंत व्यक्ती यशस्वी झाली असती. मेहनत आणि स्वतःची जिद्दही तितकीच महत्त्वाची असते.”


दरम्यान, एका ट्रोलरने कमेंट केली होती, “बाप एवढा कमवतोय तर लेकीला कॅफेमध्ये काम करण्याची काय गरज?” यावर मृण्मयीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली, “मला आत्मनिर्भर व्हायचं होतं. स्वतः कमावण्याची आणि स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याची मला हौस होती. त्यामुळे मी काम केलं आणि त्याचा मला अभिमान आहे.”


मृण्मयी कदमच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. अनेकांनी तिच्या आत्मनिर्भर विचारांचं कौतुक करत अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिला आहे.


Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी