Mrunmayee kadam : ‘बाप कमावतोय तर कामाची गरज काय?’ ट्रोलरला भाऊ कदमांच्या लेकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय विनोदवीर भाऊ कदम हे प्रेक्षकांचे कायमच आवडते कलाकार राहिले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘फू बाई फू’सारख्या कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अभिनयाइतकंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम ही देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे व्हिडिओ, व्लॉग आणि पोस्ट्स नेहमी चर्चेत असतात. भाऊ कदम यांच्याप्रमाणेच मृण्मयीला देखील प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळतं.



काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने परदेशातून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना आत्मनिर्भर होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे परदेशात शिक्षण घेत असतानाच ती कॅफेमध्ये काम करत होती. अभ्यास आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी सांभाळत तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे फोटो Instagram वर शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये ती आई-वडिलांसोबत दिसत होती. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया देत ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.


या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी मृण्मयीने स्वतः एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, “मी Instagram वर माझी पोस्ट पाहिली आणि त्यानंतर त्या पोस्टखालील कमेंट्स वाचल्या. मुली बाहेर जाऊन शिकत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, ग्रॅज्युएट होत आहेत, पुढे जात आहेत… त्यामुळे काही लोकांचा मेल इगो हर्ट होतो.”







यानंतर तिने काही ट्रोलिंग कमेंट्स वाचून दाखवल्या. एका यूजरने कमेंट केली होती, “पैसा असेल तर कुठेही उच्च शिक्षण घेता येतं.” यावर उत्तर देताना मृण्मयी म्हणाली, “हो, पैसा महत्त्वाचा असतोच. पण मेहनत नावाची गोष्टही असते. देवाने आपल्याला हातपाय दिले आहेत, मग कायम आई-वडिलांच्या पैशांवरच अवलंबून का राहायचं? स्वतः मेहनत करून काहीतरी मिळवण्यात वेगळीच समाधानाची भावना असते.”


त्यानंतर तिने आणखी काही कमेंट्स वाचल्या. एका व्यक्तीने लिहिलं होतं, “शिक्षणासाठी पैसा महत्त्वाचा असला तरी बुद्धीही लागते.” यावर मृण्मयीने उत्तर देताना म्हटलं, “जर पैशांनीच सगळं काही मिळत असतं, तर प्रत्येक श्रीमंत व्यक्ती यशस्वी झाली असती. मेहनत आणि स्वतःची जिद्दही तितकीच महत्त्वाची असते.”


दरम्यान, एका ट्रोलरने कमेंट केली होती, “बाप एवढा कमवतोय तर लेकीला कॅफेमध्ये काम करण्याची काय गरज?” यावर मृण्मयीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली, “मला आत्मनिर्भर व्हायचं होतं. स्वतः कमावण्याची आणि स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याची मला हौस होती. त्यामुळे मी काम केलं आणि त्याचा मला अभिमान आहे.”


मृण्मयी कदमच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. अनेकांनी तिच्या आत्मनिर्भर विचारांचं कौतुक करत अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिला आहे.


Comments
Add Comment

करण जोहरला अचानक काय झालं ? शाहरुख, आलिया, करिना अन मनीष मल्होत्रालाही केलं अनफॉलो

Karan Johar : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. करण

Thalapathy Vijay : थलपती विजयचा मुलगा करणार चिटपटसृष्टीत पदार्पण 'या' तारखेला रिलीज होणार पहिला चित्रपट!

थलपती विजय हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. राजकारणात प्रवेश

KGF आणि Kantara चे मेकर्स आता मराठी हिप-हॉपच्या दुनियेत; ‘येतो का नाय - पहिला वार’ची अनाउन्समेंट

मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतीय सिनेमाला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे देशातील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस

Ranveer Singh : रणवीर-फरहानच्या वादात आता सलमान खानचा प्रवेश, आता 'भाईजान' काढणार का यावर तोडगा ?

अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि फरहान अख्तर(Farhaan Akhtar) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आता सलमान खानने पुढाकार घेतल्याची

Bashir Badr : मशहूर शायर डॉ. बशीर बद्र यांचं निधन; शायरीचं एक युग संपलं

उर्दू शायरीतून दुनियेला भावूक करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचं गुरुवारी

Salman khan : सलमान खानकडून फॅन्सना खास भेट; आगामी चित्रपटाच हृदयस्पर्शी गाणं रिलीज !

सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मातृभूमी' (Matrubhoomi) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची