Minister Pratap Sarnaik : धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’

मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन (Traffic Garden) उभारण्यात येणार असून, बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. (60 'Traffic Gardens' to be built in the state in the name of Dharmaveer Anand Dighe)



विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. “भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.


या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.



पर्यावरणाचा संदेश देणारे उद्यान


या उद्यानामध्ये वृक्षाची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. सबब , वाहतुकीच्या नियमाबरोबरच नागरिकांना पर्यावरणाचे धडे देखील तिथे दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या ई -वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. हे उद्यान त्यामुळे अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.


राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Pune Minor Girl Missing Case : पुण्यात चाललंय तरी काय ? अवघ्या ४८ तासांत तब्बल ६ अल्पवयीन मुली रहस्यमयीरीत्या बेपत्ता

पुणे : पुण्यात चाललंय तरी काय ? असाच म्हणायची वेळ आली आहे. पुणे शहर आता अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या

Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल, छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज

Minister Sanjay Shirsat : एमआयएम 'कॉर्पोरेट जिहाद'चे मास्टरमाइंड, मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या 'कॉर्पोरेट जिहाद' (Corporate Jihad) प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू

Pune Illegal Schools : पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील तब्बल ४५ शाळा ठरल्या ‘बोगस’; प्रवेशापूर्वी ही यादी एकदा नक्की पाहा

पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; काही शाळांकडे मान्यता नाही तर काही शाळा परवानगीशिवाय

TCS Case : छत्रपती संभाजीनगरच्या फ्लॅटमध्ये लपली होती निदा खान; सोबत होते ‘हे’ ५ जण, प्रकरण अधिक गूढ

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टिसीएस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड

Pune Crime News : 'लग्न दुसऱ्याशी कसं काय?' जाब विचारत घरात घुसला अन् थेट तरुणीचा गळाच चिरला...आरोपी अटकेत

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Crime News) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पुण्यातील चंदननगर