बारामतीत 'दादां'ची परंपरा आता 'जय'च्या हाती

पवारांच्या 'जनता दरबारा'ला पुन्हा गजबज; अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत जय पवारांचा लोकांशी थेट संवाद


मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता पवार कुटुंबीयांनी कंबर कसली आहे. अजितदादांची अत्यंत लोकप्रिय असलेली 'जनता दरबारा'ची परंपरा आता त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी पुढे नेण्यास सुरुवात केली असून, बारामतीत आता नव्या 'दादां'ची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


अजित पवार हे बारामतीतील नागरिकांच्या समस्या जागेवरच निकाली काढण्यासाठी नियमितपणे जनता दरबार भरवत असत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश देऊन सामान्यांची कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यशैली ही त्यांची ओळख होती. दादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला असला, तरी जनसंपर्काचा हा महत्त्वाचा दुवा काहीसा विरळ झाला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी जय पवार आता दर गुरुवारी बारामती येथील 'सहयोग' या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत.


या जनता दरबारात बारामतीसह आसपासच्या तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी घेऊन येत आहेत. जय पवार नुसते समस्या ऐकूनच घेत नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे. अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा 'सहयोग'वर नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

राजकीय पुनरुत्थानाचे संकेत?


नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जय पवार यांनी आपला सामाजिक आणि राजकीय वावर वाढवला आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि आता थेट 'जनता दरबार' यामुळे जय पवार हे भविष्यात बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मालमत्तांची तपासणी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

- राज्यव्यापी तपासणीचा तीन महिन्यांत अहवाल देणार मुंबई : इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे

Nilesh Rane : दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ; आ. निलेश राणेंच्या लक्षवेधीवर मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

- प्रशासकीय दिरंगाईसाठी चौकशी समिती गठीत मुंबई : कोकणची वैभवशाली परंपरा असलेल्या दशावतार लोककलेच्या

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Atul save : दिव्यांग शाळांच्या नूतनीकरणासाठी ६० दिवसांची मुदत; मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : दिव्यांग शाळांच्या ऑनलाईन नूतनीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी, पोर्टलवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो