Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदल कायम; गुरुवारी 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात होणारे हवामान बदल दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. कुठे पाऊस पडतोय तर कुठे उष्णेतेचा कहर माजला आहे. हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या बातमीनुसार ७ मे ला गुरुवारी काही भागात अवकाळी पाऊस, आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे यामुळे काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह सर्वच जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ७२ तास हवेतील आद्रता प्रचंड वाढणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे.


कोकणात गेल्या काही काळापासून उष्ण आणि दमट हवामानाने नागरिक हैरान झाले आहेत. त्यामुळे कोकणात उकाडा तर राहणारच आहे शिवाय वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.



मध्य महाराष्ट्र


घाटमाथा भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली असून, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर भागात ताशी ४० - ५० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच कमाल तापमान ३७-४० अंशाच्या दरम्यान राहणार आहे.



उत्तर महाराष्ट्र


उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढलेलाच राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमान ४०-४४ अंशापर्यंत जाणार असून, किमान २२-२६ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.



मराठवाडाचे हवामान


मराठवाड्याला पाऊस चांगलाच झोडपणार असून काही ठिकाणी उष्णतेचा पारा हा चढलेला दिसणार आहे. शिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भ


गेल्या काही दिवसात पावसाने विदर्भाला चांगलेच झोडपून निघालं आणि आता हे संकट हळूहळू मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकणात गेलं आहे.


दरम्यान काही दिवस हे असच वातावरण महाराष्ट्रात राहणार असून, नागरिकांनी विजा आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त