Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची शेती केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. भाजपाच्या स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांनी पोलिसांसमवेत या जागेची पाहणी करून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.


भांडुप जलाशय टेकडीवरील डोंगरावर दुर्मिळ जागी काही समाजकंटक गांजाची शेती करत असल्याची माहिती मिळताच भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित भांडुप पोलीस ठाण्यास कळवले. भांडुप पोलिसांनी या माहितीची तातडीने दखल घेत घटनास्थळी पाहणी करून शेतीची माहिती घेतली. यामध्ये ही शेती गांजाचीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे डोंगर भागात लागवड केलेली ही गांजाची झाडे पूर्णपणे नष्ट केली. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या परिसरात अशा प्रकारची कोणतीही बेकायदेशीर कृत्ये निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा,असे आवाहन असे नगरसेविका जागृती पाटील यांनी केले आहे.

Comments
Add Comment

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Pydhonie Family News : ना कलिंगड, ना बिर्याणी, उंदिर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीतील 'त्या' चौघांचा मृत्यू

मुंबई : पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला

Mumbai Water Metro : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा