मुंबई वॉटर मेट्रोच्या आराखड्याला गती ,मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश


मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुंबई वॉटर मेट्रो’ प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या विविध स्थानकांच्या संकल्पना आणि आराखड्यांचे (डिझाइन) सादरीकरण बुधवारी मंत्रालयात पार पडले. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.


आयआयटी मुंबईच्या ‘इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर’च्या वतीने वॉटर मेट्रो स्थानकांच्या विविध संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या स्थानकांच्या ले-आऊटवर सखोल चर्चा करण्यात आली. या सादरीकरणामध्ये प्रामुख्याने स्थानकांवरील डॉकची रचना कशी असावी, प्रवाशांची सुरक्षित आणि सुलभ हाताळणी कशी केली जाईल, गर्दीचे व्यवस्थापन (ट्राफिक मॅनेजमेंट), तसेच जलमार्गावरील बोटींची हालचाल आणि वळण व्यवस्थेबाबत नियोजन मांडण्यात आले.


या बैठकीला आमदार दीपक केसरकर आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्थानकांची रचना करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य