मुंबई वॉटर मेट्रोच्या आराखड्याला गती ,मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश


मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुंबई वॉटर मेट्रो’ प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या विविध स्थानकांच्या संकल्पना आणि आराखड्यांचे (डिझाइन) सादरीकरण बुधवारी मंत्रालयात पार पडले. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.


आयआयटी मुंबईच्या ‘इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर’च्या वतीने वॉटर मेट्रो स्थानकांच्या विविध संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या स्थानकांच्या ले-आऊटवर सखोल चर्चा करण्यात आली. या सादरीकरणामध्ये प्रामुख्याने स्थानकांवरील डॉकची रचना कशी असावी, प्रवाशांची सुरक्षित आणि सुलभ हाताळणी कशी केली जाईल, गर्दीचे व्यवस्थापन (ट्राफिक मॅनेजमेंट), तसेच जलमार्गावरील बोटींची हालचाल आणि वळण व्यवस्थेबाबत नियोजन मांडण्यात आले.


या बैठकीला आमदार दीपक केसरकर आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्थानकांची रचना करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू