Jalgaon Heatwave : जळगाव उष्णतेच्या तडाख्याने केळी बागांचे नुकसान

जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. प्रखर उन्हामुळे झाडे करपत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावल तालुक्यातील हा परिसर तालुक्यातील बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेषतः केळी शेतीवर येथील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे केळी बागांचे संरक्षण करणे आव्हानात्मक बनले आहे. पाण्याची कमतरता आणि योग्य वेळी सिंचन न झाल्याने झाडांची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.



शेतकऱ्यांना आता सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा शेतीची कामे उरकावी लागत आहेत. दिवसभरातील कडक उन्हामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे. त्यातच मजुरांची टंचाई असल्याने शेती कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रारही शेतकरी व्यक्त करत आहेत. रब्बी हंगामात काही प्रमाणात उत्पादन मिळूनही आर्थिक स्थिती सुधारलेली नसल्याने खरीप हंगामाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.



दरम्यान, बाजारात केळीच्या भावात वाढ झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून केळी कमी दरात खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसून आर्थिक अडचणी अधिकच वाढत आहेत. या सर्व समस्यांमध्ये भर म्हणजे वीज पुरवठ्याचे विस्कळीत वेळापत्रक. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास दिली जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री २.३० ते सकाळी १०.३० आणि दिवसा १०.३० ते सायंकाळी ५.३० अशा वेळेत वीज पुरवठा केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना रात्री जागून शेतीची कामे करावी लागत असून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, वीज पुरवठ्याच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का?

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस 'वर्षा'वर घेणार भाजप आमदारांची 'शाळा'

- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मांडणार 'रिपोर्ट कार्ड'; पक्षीय कामात उदासीनता दाखवणाऱ्यांचे कान टोचणार मुंबई :

TET Exam 2026: TET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा केंद्रावर लागू झाले नवे नियम

TET Exam 2026 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा अधिक कडक नियमांसह घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार- कृषी मंत्री दत्तात्रय

Murlidhar Mohol Father passes away : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; आज पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ