Jalgaon Heatwave : जळगाव उष्णतेच्या तडाख्याने केळी बागांचे नुकसान

जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. प्रखर उन्हामुळे झाडे करपत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावल तालुक्यातील हा परिसर तालुक्यातील बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेषतः केळी शेतीवर येथील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे केळी बागांचे संरक्षण करणे आव्हानात्मक बनले आहे. पाण्याची कमतरता आणि योग्य वेळी सिंचन न झाल्याने झाडांची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.



शेतकऱ्यांना आता सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा शेतीची कामे उरकावी लागत आहेत. दिवसभरातील कडक उन्हामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे. त्यातच मजुरांची टंचाई असल्याने शेती कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रारही शेतकरी व्यक्त करत आहेत. रब्बी हंगामात काही प्रमाणात उत्पादन मिळूनही आर्थिक स्थिती सुधारलेली नसल्याने खरीप हंगामाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.



दरम्यान, बाजारात केळीच्या भावात वाढ झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून केळी कमी दरात खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसून आर्थिक अडचणी अधिकच वाढत आहेत. या सर्व समस्यांमध्ये भर म्हणजे वीज पुरवठ्याचे विस्कळीत वेळापत्रक. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास दिली जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री २.३० ते सकाळी १०.३० आणि दिवसा १०.३० ते सायंकाळी ५.३० अशा वेळेत वीज पुरवठा केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना रात्री जागून शेतीची कामे करावी लागत असून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, वीज पुरवठ्याच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

बारामती बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचे १ कोटी रुपयांचे बक्षीस — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लाखणी आणि अकोलेही राज्यात अव्वल मुंबई: स्वर्गीय

जळगाव : यश जैनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी अन...

जळगाव : अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीकडून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याची खंडणी

Pune Crime : जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; १० जणांविरोधात गुन्हा दाखल,पुण्यात खळबळ

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनगणनेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला ५ ते १० जणांनी

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातपाठोपाठ राज्यातील 'या' 50 भोंदूंवर कारवाई , कारवाईत नाशिकचे सर्वाधिक भोंदू

नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आले आणि या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवाले. खरात प्रकरण समोर येताच

Legislative Council : महायुतीत विधानपरिषदेच्या १५ जागांचे वाटप ठरले ? छत्रपती संभाजीनगरचा तिढा कायम

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीमधील जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट

Crime : तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना ? 'याठिकाणी' २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) भवरखेड येथील बनावट दूध निर्मितीवर कारवाई करत २६६ लिटर भेसळयुक्त दूध