पश्चिम आशियामध्ये लष्करी तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना मुक्त करण्यासाठी लष्करी मोहिम जाहीर केली आहे. यानंतर सोमवारी इराण ने आक्रमक होत अमेरिका ला इशारा दिला की, जर त्यांनी होर्मुझ जलसंधी मध्ये प्रवेश केला, तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल.
इराणच्या मुख्य लष्करी कमांड खातम अल-अंबिया सेंट्रल मुख्यालय ने म्हटले आहे की, “कोणतेही परदेशी सशस्त्र दल, विशेषतः आक्रमक अमेरिकन सैन्य, होर्मुझ जलसंधीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर हल्ला केला जाईल.” इराणने असा दावा देखील केला आहे की या जलमार्गाची सुरक्षा पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात आहे आणि कोणत्याही जहाजाला सुरक्षित मार्ग हवा असल्यास इराणी सशस्त्र दलांशी समन्वय करणे आवश्यक आहे.
होर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणने दावा केला आहे की, सोमवारी त्यांनी एका अमेरिकन ...
यूएस सेंट्रल कमांड ने या लष्करी तैनातीची पुष्टी केली आहे. या मोहिमेत मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी सज्ज विध्वंसक जहाजे, १०० हून अधिक विमाने आणि सुमारे १५,००० सैनिकांचा समावेश आहे. पेंटागन च्या नेतृत्वाखाली ही मोहीम सोमवारी सकाळपासून सुरू झाली असून, व्यापारी जहाजांसाठी नौवहन स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करणे हा तिचा उद्देश आहे. अमेरिकेच्या या घोषणेनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. मागील काही दिवसांत पश्चिम आशियात तुलनेने शांतता होती, मात्र अमेरिकेच्या या घोषणेमुळे परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली आहे.
पश्चिम आशियातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) पुन्हा एकदा सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ...
बीजिंग : चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारिक आणि कूटनीतिक तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने इराणकडून तेल खरेदी केल्याचा आरोप ...
११ एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे पाकिस्तानने दोन्ही देशांमधील पहिल्या टप्प्यातील थेट चर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळी कोणताही ठोस करार झाला नव्हता, परंतु परिस्थिती बिघडू नये म्हणून २१ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवला. इशाक डार आणि अब्बास अराघची यांच्यातील अलीकडील चर्चा ही त्याच प्रक्रियेचा भाग आहे. पाकिस्तानने स्पष्ट केले आहे की, केवळ संवाद आणि राजनैतिक मार्गानेच या प्रदेशात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते.