Maharashtra Cabinet : दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल? दमदार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना नारळ मिळणार

- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजीची चर्चा


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांकडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात असून, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. (Maharashtra Cabinet)


गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात असून, या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यात प्रभावी कामगिरी दाखवली नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.(Maharashtra Cabinet)



राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, कामगिरीत कमी पडणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले तरी त्यांना पूर्णपणे बाजूला न ठेवता पक्ष संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तळागाळापर्यंत पक्षाची ताकद वाढवणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे हा बदल काही नेत्यांसाठी धक्का असला, तरी काहींसाठी तो नवी संधी ठरू शकतो. या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता असून, सध्या राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या काही नेत्यांना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. याशिवाय, आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Maharashtra Cabinet)



कोणाला डच्चू मिळणार?


काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. तसेच, वादग्रस्त ठरलेल्या किंवा स्थानिक स्तरावर जनमानसात नाराजी निर्माण करणाऱ्या मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.(Maharashtra Cabinet)

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन

Nashik : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवर अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतराचा