Maharashtra Cabinet : दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल? दमदार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना नारळ मिळणार

- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजीची चर्चा


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांकडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात असून, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. (Maharashtra Cabinet)


गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात असून, या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यात प्रभावी कामगिरी दाखवली नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.(Maharashtra Cabinet)



राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, कामगिरीत कमी पडणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले तरी त्यांना पूर्णपणे बाजूला न ठेवता पक्ष संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तळागाळापर्यंत पक्षाची ताकद वाढवणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे हा बदल काही नेत्यांसाठी धक्का असला, तरी काहींसाठी तो नवी संधी ठरू शकतो. या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता असून, सध्या राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या काही नेत्यांना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. याशिवाय, आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Maharashtra Cabinet)



कोणाला डच्चू मिळणार?


काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. तसेच, वादग्रस्त ठरलेल्या किंवा स्थानिक स्तरावर जनमानसात नाराजी निर्माण करणाऱ्या मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.(Maharashtra Cabinet)

Comments
Add Comment

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Mobile Price Hike : मोबाईल खरेदी महाग का पडतेय? स्मार्टफोनच्या वाढत्या किमतीमागची ५ मोठी कारणे

मुंबई : नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वाढलेल्या किमती पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक विक्रम! २२ दिवसांतच सचिनचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

मुंबई : भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार ठरत असलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आणखी एक ऐतिहासिक पराक्रम आपल्या

Indian Idol 16 : ज्योतिर्मयी नायक ठरली इंडियन आयडल 16 ची विजेती!

मुंबई : लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो (Reality Show) 'इंडियन आयडल १६' (Indian Idol 16) ला अखेर विजेती (Winner) मिळाली आहे. तब्बल १० महिन्यांच्या

Kushal Badrike In MHJ : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कुशल बद्रिकेची धमाकेदार एन्ट्री; दत्तू मोरेसोबत रंगणार हसण्याचा डबल डोस!

मुंबई : मराठी प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हास्याचा जल्लोष घेऊन येत

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी