Maharashtra Cabinet : दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल? दमदार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना नारळ मिळणार

- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजीची चर्चा


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांकडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात असून, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. (Maharashtra Cabinet)


गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात असून, या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यात प्रभावी कामगिरी दाखवली नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.(Maharashtra Cabinet)



राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, कामगिरीत कमी पडणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले तरी त्यांना पूर्णपणे बाजूला न ठेवता पक्ष संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तळागाळापर्यंत पक्षाची ताकद वाढवणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे हा बदल काही नेत्यांसाठी धक्का असला, तरी काहींसाठी तो नवी संधी ठरू शकतो. या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता असून, सध्या राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या काही नेत्यांना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. याशिवाय, आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Maharashtra Cabinet)



कोणाला डच्चू मिळणार?


काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. तसेच, वादग्रस्त ठरलेल्या किंवा स्थानिक स्तरावर जनमानसात नाराजी निर्माण करणाऱ्या मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.(Maharashtra Cabinet)

Comments
Add Comment

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा

Pritam Chakraborty : प्रसिध्द संगीतकारचा 'त्या' पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ; निवृत्तीची चर्चा रंगली

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती (Music composer Pritam Chakraborty) यांनी १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त सोशल

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण

DCM Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबईत शुन्य जीवितहानी उद्दीत ठेवा मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे दिले