Census 2027 : जनगणना २०२७ च्या नावाखाली फसवणूक? बनावट अर्ज व्हायरल; प्रशासनाचा इशारा

मुंबई : जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा अर्ज पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक किंवा अर्जांपासून दूर राहावे, असे ठाम आवाहन करण्यात आले आहे. (Census 2027)


प्रशासनाच्या माहितीनुसार, जनगणना प्रक्रियेसाठी कोणतीही माहिती केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच सादर करायची आहे. यासाठी नागरिकांसमोर दोन अधिकृत पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे स्व-नोंदणी (Self Enumeration). या अंतर्गत नागरिक अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in वर जाऊन ३३ अधिसूचित प्रश्नांची अचूक माहिती भरू शकतात. फॉर्म पूर्ण केल्यानंतर नागरिकांना ‘SE ID’ मिळणार असून, पुढील टप्प्यात प्रगणक घरभेटीदरम्यान याची पडताळणी करणार आहेत.



दुसरा पर्याय म्हणजे प्रत्यक्ष माहिती देण्याचा. दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या भेटीदरम्यान नागरिकांनी योग्य आणि खरी माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.


दरम्यान, काही फसवणूक करणारे घटक सोशल मीडियावर बनावट फॉर्म, लिंक आणि अर्ज शेअर करून नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः बँक तपशील, आधार क्रमांक किंवा मोबाईल OTP सारखी संवेदनशील माहिती मागितली जात असल्यास ती देणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


तसेच, अधिकृत प्रगणकांची ओळख पटवूनच माहिती द्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. प्रगणकांकडे अधिकृत ओळखपत्र असणार असून नागरिकांनी ते तपासूनच प्रतिसाद द्यावा.



प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा अर्जाबाबत त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे. “केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत प्रतिनिधींवरच विश्वास ठेवा,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.


जनगणना ही देशाच्या नियोजन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, तसेच अफवा आणि फसवणुकीपासून दूर राहावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.


Comments
Add Comment

Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

- विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर! मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण

Ahilyanagar : धुवाधार पावसाचा कहर ! घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद, अनेक धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग मार्गांवर प्रवेशबंदी

Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : तुकोबाराय व माऊलींच्या पालखी स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कोकणासह प्रमुख शहरांमध्ये 'ड्रोन' सर्वेक्षण

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; गौण खनिजांच्या देखरेखीसाठी कोकणात हायटेक