West Bengal Results : ममता दीदींचा गड ढासळला! पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक मुसंडी; जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांचा जोरदार हल्लाबोल

अमरावती : देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत असून तीन राज्यांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने तब्बल २०० जागांच्या आसपास मुसंडी मारत ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आणली आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभरात साजरा होत असून, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयातही महिला कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. या महाविजयानंतर माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे. "जो कोणी सनातन आणि भगव्याला विरोध करेल, त्याच्या पाठीशी कोणतेही राज्य उभे राहणार नाही; आज ममता दीदींचा अहंकार धुळीस मिळाला आहे," असा घणाघात राणा यांनी केला.



अमित शहांच्या रणनीतीचा हा विजय


पश्चिम बंगाल निवडणुकीतील भाजपच्या मुसंडीनंतर माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल हा देशाचाच अविभाज्य भाग असून तिथल्या जनतेने संपूर्ण देशाला अपेक्षित असा निकाल दिला आहे. आज खऱ्या अर्थाने ममता दीदींचा इतक्या वर्षांचा 'खेला खतम' (खेळ संपला) झाला आहे, अशी घणाघाती टीका राणा यांनी केली. तसेच, या अभूतपूर्व विजयाचे संपूर्ण श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अचूक रणनीतीला देत त्यांनी भाजपच्या यशाचे कौतुक केले.



आता 'खेला होबे' नाही, ममता दीदींचा 'खेला खतम'...


"सनातन धर्म आणि भगव्या रंगाला जो विरोध करेल, त्याच्या पाठीशी कोणतेही राज्य उभे राहणार नाही. ममता बॅनर्जींनी नेहमी अत्याचार करणाऱ्यांना साथ दिली, पण आज त्यांचा अहंकार पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे आता 'खेला होबे' नाही, तर दीदींचा 'खेला खतम' झाला आहे," असा सणसणीत टोला राणा यांनी लगावला. तसेच, या ऐतिहासिक निकालामुळे पश्चिम बंगालमधील होऊन गेलेल्या थोर नेत्यांच्या आत्म्यालाही आज नक्कीच आनंद झाला असेल, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.



'जय श्रीराम'चा जयघोष अन् हातात रसगुल्ल्याचे डबे...


पश्चिम बंगालसह तीन राज्यांमध्ये मिळालेल्या भाजपच्या दणदणीत विजयाचा उत्साह मुंबईतही पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या भाजप पक्ष कार्यालयात नगरसेवकांनी हातात चक्क बंगालची ओळख असलेले 'रसगुल्ल्याचे डबे' घेऊन अनोख्या पद्धतीने जल्लोष केला. यावेळी 'जय श्रीराम'च्या गाण्यांवर ठेका धरत हेतल गाला, प्रीती साटम आणि शीतल गंभीर या महिला नगरसेविकांनी फुगड्या खेळून विजयाचा आनंद लुटला. तसेच, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनीही इतर महिला सहकाऱ्यांसोबत एकत्र येत या ऐतिहासिक यशाचे जोरदार सेलिब्रेशन केले.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या