Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी' (वैचारिक नक्षलवादी) या उल्लेखावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय संसदीय बाबी मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही विरोधी नेत्यांना 'नक्षलवादी मानसिकतेचे' म्हटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 'दिमागी नक्षलवादी' नेमके कोण आहेत हे स्पष्ट करताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत; त्यानुसार, जे नक्षलवाद्यांचे समर्थन करतात आणि भारतीय संविधानाचा स्वीकार करत नाहीत, जे फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहतात आणि कलम ३७० चे समर्थन करतात, तसेच जे भारताच्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांना देशापासून वेगळे करण्यासाठी 'चिकन नेक' कॉरिडोअर तोडण्याची भाषा करतात, तेच 'दिमागी नक्षलवादी' आहेत.



शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशातून सशस्त्र नक्षलवादाचे यशस्वीपणे उच्चाटन केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले होते आणि सुरक्षा दलांच्या बलिदानाचे स्मरण केले होते. पंतप्रधान म्हणाले होते की, "जंगलात शस्त्र हातात घेणाऱ्या नक्षलवाद्यांचा बिमोड झाला असला, तरी सार्वजनिक जीवनात आणि विविध शासकीय समित्यांमध्ये अजूनही 'दिमागी नक्षलवादी' (नक्षलवादी विचारसरणीचे लोक) सक्रिय आहेत. देशाच्या प्रगतीसाठी अशा लोकांना ओळखणे आणि त्यांना वेगळे करणे आवश्यक आहे."



पंतप्रधानांच्या या भाषणानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी आरोप केला की, दोन-तीन वर्षांपूर्वी राजकीय विरोधकांसाठी 'अर्बन नक्षल' शब्द वापरण्यात आला होता, ज्यावर संसदेत विचारले असता गृह मंत्रालयाने असा कोणताही कायदेशीर शब्द वा व्याख्या अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा विरोधकांसाठी अशा शब्दांचा वापर केला जात आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील