भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द, महत्त्वाचे कारण समोर

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल ठरविण्यात आली आहे. नगर विकास विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत शासन आदेश जारी केला आहे.


निवड रद्द होण्याचे कारण काय ?


गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून निवडणूक लढविताना सादर केलेले जात प्रमाणपत्र जळगाव येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यानंतर जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१क) व (ब) नुसार कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता.


या प्रस्तावाच्या अनुषंगाने २३ एप्रिल २०२६ रोजीच्या जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार भंगाळे यांची नगराध्यक्षपदाची निवड २३ एप्रिल २०२६ पासून भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल ठरविण्यात आली आहे. या निर्णयानुसार गायत्री भंगाळे यांना भुसावळ नगरपरिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Forecast: मान्सूनची गती मंदावली; राज्यातील बहुतांश भागांत उकाडा कायम

पाऊस कधी येणार? उष्णतेने नागरिक हैराण Maharashtra Weather Update: जून महिना अर्धा संपत आला असला तरी राज्यात मान्सूनची (Monsoon) जोरदार

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद वाढणार, शिवसेनेच्या खासदारांची संख्या ७ वरून १३ वर पोहोचणार

मुंबई: लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने छत्रपती

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकासासाठी, ३ हजार ९९३.९० कोटींच्या आराखड्याला मंजुरी

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Shri Vitthal-Rukmini Temple) परिसर विकास व

Transforming Nagpur : समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि नवीन रिंग रोडमुळे हैदराबादचे अंतर आता अवघ्या ३.५ तासांत!

नागपूर: विदर्भातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे.

Chief Minister Devendra Fadnavis : कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल

विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित