Delhi AC Blast: दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीचा स्फोट; स्फोटामुळे भीषण आग; ९ जणांचा मृत्यू,अनेक जखमी

नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली इमारतीत पहाटे एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही आग दुसऱ्या मजल्यावरील एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग काही क्षणांतच इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली.


आग इतकी भीषण होती की अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. काहींचे मृतदेह बेडवरच आढळले, तर काही जणांचे मृतदेह जिन्यावर जळालेल्या अवस्थेत सापडले. तिसऱ्या मजल्यावर राहणारे काही लोक जीव वाचवण्यासाठी छताकडे पळाले, मात्र छताचा दरवाजा बंद होता. दरवाजा बंद असल्यामुळे बरेच जण अडकले आणि जिन्यावरच त्यांचा मृत्यू झाला.



इमारतीच्या पुढील बाजूस राहणाऱ्या काही रहिवाशांना वाचवण्यात यश आले, मात्र मागच्या बाजूस असलेल्यांना बाहेर काढणे कठीण ठरले. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे, तीन मृतदेह बेडवर आढळले असून यावरून आगीची तीव्रता लक्षात येते.





स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितले की, दुसऱ्या मजल्याच्या मागील बाजूस पाच मृतदेह सापडले, तर एक मृतदेह मागील भागात आणि तीन वरच्या मजल्यावर आढळले. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी कटण्यात येणार आहे.



अग्निशमन अधिकारी मुकेश वर्मा यांच्या माहितीनुसार, इमारतीच्या मागील बाजूस आग लागली होती, इमारतीतून नऊ जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. इमारतीत फक्त एकच जिना होता आणि बाल्कनीला जाळ्या लावल्या असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी आल्या. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांमध्ये सध्या भीती पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या