Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे.


फॉरेन्सिक तपासणीत मृतांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये असामान्य बदल दिसून आले आहेत. मेंदू, हृदय आणि आतडी यांचा रंग बदलून हिरवट झाल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, असा बदल सामान्य अन्नविषबाधेत दिसत नाही आणि हा अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा परिणाम असू शकतो. मात्र या अहवालाला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.



याशिवाय, मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन या शक्तिशाली वेदनाशामक औषधाचे अंश आढळल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मॉर्फिन हे साधारणतः कॅन्सर किंवा शस्त्रक्रियेनंतर तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. त्यामुळे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या शरीरात हे औषध कसे आले, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


सुरुवातीला कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेचा संशय होता, मात्र मॉर्फिनचा शोध लागल्यानंतर हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी आता कलिंगड विक्रेता, अन्न सेवनाचा तपशील तसेच कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास या सर्व बाजूंचा सखोल तपास सुरू केला आहे.


दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या अंतर्गत अवयवांच्या रंगबदलावर तज्ज्ञांकडून अधिक अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे प्रकरण साध्या अन्नविषबाधेपेक्षा अधिक गुंतागुंतीचे असल्याचे दिसून येत आहे.



या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिस आता या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा; फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील फसवणुकीला बळी पडू नका; शेतकरी व युवकांना कृषी मंत्र्यांचे आवाहन मुंबई : मुंबई

Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल

Shrikant Shinde : ‘टिप नाही तर राईड नाही!’ ॲप-आधारित टॅक्सींच्या मनमानीविरोधात श्रीकांत शिंदे आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी

Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या 'लँड जिहाद'वर प्रहार

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद

Raj Thackeray: वाढदिवशी होर्डिंग्जऐवजी झाडे लावा, पाणवठे उभारा!

- राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन; १४ जूनला मुंबईत नसल्याने भेटीला येऊ नका मुंबई : महाराष्ट्र