Sunetra Pawar : बीडमध्ये ध्वजारोहण करताना सुनेत्रा पवार भावूक, अजितदादांच्या आठवणीने पाणावले डोळे!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण सोहळे आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने शासकीय ध्वजारोहण केले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.



अजित पवार हयात असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण नेहमी त्यांच्याच हस्ते होत असे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या प्रथमच बीड दौऱ्यावर आल्या होत्या. प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्यानंतर जेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा अजित पवार यांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. या भावूक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.





पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी सर्वप्रथम राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. अत्यंत भावूक होत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे. आज मी येथे ध्वजारोहण केले आहे. बीडच्या तमाम जनतेला मी एवढेच सांगू इच्छिते की, दादांनी या जिल्ह्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती, जे 'ड्रीम प्रोजेक्ट्स' हाती घेतले होते, ते सर्व पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन. बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील एक अव्वल आणि प्रगत जिल्हा म्हणून पुढे आणण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन."

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील

Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील