मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून शनिवारी, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मुंबईतून सुमारे तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा राज्य शिक्षण मंडळाने १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान राज्यभरात परीक्षा घेतल्या. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुंबईतून तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांना आता २ मे रोजी दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
गुणपडताळणीसाठी ३ मेपासून अर्ज करता येणार : या निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी ३ ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ॲानलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले.
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल : https://results.digilocker.gov.in , https://mahahsscboard.in , https://hscresult.mkcl.org , https://results.targetpublications.org , https://results.navneet.com , https://www.tv9marathi.com






