Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2 मे रोजी म्हणजेच शनिवारी २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे.



संघ निवडीनंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर, मुख्य निवडकर्ता अस्मिता शर्मा आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया एका पत्रकार परिषदेत संघांची घोषणा करतील. निवड समिती २८ मे ते २ जून दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी, १० ते १३ जुलै दरम्यान लॉर्ड्सवर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि इंग्लंड 'अ' संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत 'अ' संघाची निवड करेल.



भारताला २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाच्या गट १ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाचा सामना सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स या संघांशी होणार आहे


भारताच्या तयारीबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १-४ ने गमावली आहे, ही चिंतेची बाब आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२० च्या महिला टी-२० विश्वचषकात उपविजेता ठरला होता. पण या प्रकारात त्यांना अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. २०२५ मध्ये मायदेशात महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि यावेळी विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. दरम्यान, यजमान इंग्लंडने २८ एप्रिल रोजी आपला संघ जाहीर केला, तर गतविजेत्या न्यूझीलंडनेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यावर्षी प्रथमच या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार असून, सात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ३३ सामने खेळले जाणार आहेत.

Comments
Add Comment

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या

मुंबई, गुजरातहून बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे सेवांना मुदतवाढ मुंबई : प्रवाशांची

Weather Department : महाराष्ट्रासह १७ राज्यांत मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मुंबई : भारतीय हवामान विभागाने देशातील हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचा

Mulund Station : मुलुंड स्थानकात पादचारी पुलासाठी मध्यरात्री विशेष ब्लॉक

२५० टन क्रेनने गर्डर लाँचिंगचे काम; दोन लोकल फेऱ्या रद्द मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर नवीन ६ मीटर रुंदीच्या

Indian Railways : मुंबई रेल्वे आरक्षण सेवा साडेतीन तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमधील ‘स्टॅटिक’ आणि ‘डायनॅमिक’ फाइल्सच्या कॉम्प्रेशनच्या तांत्रिक