- अपघात की टार्गेट किलिंग?
पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातून पुन्हा एकदा एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. भारतासाठी दीर्घकाळ धोकादायक ठरलेला आणि जैश-ए-मोहम्मदच्या उच्च नेतृत्वातील महत्त्वाचा चेहरा मौलाना सलमान अजहर (Maulana Salman Azhar) याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हादरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सलमान अजहरला एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले असून, हा केवळ अपघात आहे की अत्यंत नियोजित ‘टार्गेट ऑपरेशन’? यावरून पाकिस्तानात तर्कवितर्कांचा बाजार तापला आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता बाहेरील भागात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या वाढून १४ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी याची ...
जैशसाठी मोठा धक्का :
सलग घटनांमुळे वाढली शंका :
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच लष्कर-ए-तैयबाचा एक कमांडर शेख युसूफ अफरीदी याचाही अशाच संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. दोन उच्च दर्जाच्या दहशतवाद्यांच्या सलग मृत्यूंमुळे पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे “अज्ञात शक्ती” किंवा “क्लॅन्डेस्टाईन ऑपरेशन्स” याबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आज म्हणजेच मंगळवार २८ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. गेल्या ४८ तासांतील इस्लामाबादचा हा ...
पाकिस्तानची गुप्तता आणि वाढता संशय :
सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह :
सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दहशतवाद्यांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागातच अशा घटना घडत असल्याने “सेफ हाऊस” ही संकल्पना आता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, या घटना योगायोग नसून दहशतवादी नेटवर्कवर दबाव वाढवण्यासाठी केलेल्या लक्षित कारवाया असू शकतात. मात्र याबाबत ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
सोशल मीडियावर चर्चा तापली :
या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही जण याला “टार्गेट किलिंग” म्हणत आहेत, तर काही जण यामागे अंतर्गत गटबाजी किंवा सुरक्षा अपयश असल्याचा दावा करत आहेत.