Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा


अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७ ऑगस्टपर्यंचे नियोजन


मुंबई : पावसाळा तोंडावर आला असला तरी अन निनोेचे सावट कायम असल्यामुळे पावसाचा नेमका अंदाज बांधणे अशक्य आहे. तरीही पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता लक्षात घेता येत्या १५ मे पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाहीर केले. सध्या तलावांमधील उपलब्ध साठा आणि राज्य शासनाकडून भातसा आणि वैतरणा धरणातून निभावणी साठा अर्थात राखीव कोट्यातील पाणी याच्या आधारे पाण्याचे नियोजन करताना दहा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठा, राखीव साठ्यातील पाणी आणि कपातीनंतर बचत केलेला साठा याद्वारे पाणी वाचवून येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा राखून मुंबईकरांची पाण्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.


 

[caption id="attachment_1020688" align="alignnone" width="442"] water cut news[/caption]

 


मान्सूनपूर्व आढावा संदर्भात विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा,मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, मोडक सागर या सर्व धरणांमध्ये सध्या २८ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध अल निनोचा प्रभाव लक्षात घेता पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवली जात आहे. येत्या १ मे नंतर याची आणखी स्थिती समजू शकेल. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यामध्ये पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे आवश्यक आहे.



तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे. त्याला मंजुरी प्राप्त होईल. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले तरी आतापर्यंत ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. ही कपात केल्यास मुंबईला १७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवले जावू शकते. परंतु सध्याचा उपलब्ध पाणी साठा ४ जुलैपर्यंतच पुरेल एवढा आहे. त्यामुळे येत्या १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग