Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा


अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७ ऑगस्टपर्यंचे नियोजन


मुंबई : पावसाळा तोंडावर आला असला तरी अन निनोेचे सावट कायम असल्यामुळे पावसाचा नेमका अंदाज बांधणे अशक्य आहे. तरीही पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता लक्षात घेता येत्या १५ मे पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाहीर केले. सध्या तलावांमधील उपलब्ध साठा आणि राज्य शासनाकडून भातसा आणि वैतरणा धरणातून निभावणी साठा अर्थात राखीव कोट्यातील पाणी याच्या आधारे पाण्याचे नियोजन करताना दहा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठा, राखीव साठ्यातील पाणी आणि कपातीनंतर बचत केलेला साठा याद्वारे पाणी वाचवून येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा राखून मुंबईकरांची पाण्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.


 

[caption id="attachment_1020688" align="alignnone" width="442"] water cut news[/caption]

 


मान्सूनपूर्व आढावा संदर्भात विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा,मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, मोडक सागर या सर्व धरणांमध्ये सध्या २८ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध अल निनोचा प्रभाव लक्षात घेता पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवली जात आहे. येत्या १ मे नंतर याची आणखी स्थिती समजू शकेल. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यामध्ये पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे आवश्यक आहे.



तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे. त्याला मंजुरी प्राप्त होईल. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले तरी आतापर्यंत ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. ही कपात केल्यास मुंबईला १७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवले जावू शकते. परंतु सध्याचा उपलब्ध पाणी साठा ४ जुलैपर्यंतच पुरेल एवढा आहे. त्यामुळे येत्या १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात