महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा
अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७ ऑगस्टपर्यंचे नियोजन
मुंबई : पावसाळा तोंडावर आला असला तरी अन निनोेचे सावट कायम असल्यामुळे पावसाचा नेमका अंदाज बांधणे अशक्य आहे. तरीही पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता लक्षात घेता येत्या १५ मे पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाहीर केले. सध्या तलावांमधील उपलब्ध साठा आणि राज्य शासनाकडून भातसा आणि वैतरणा धरणातून निभावणी साठा अर्थात राखीव कोट्यातील पाणी याच्या आधारे पाण्याचे नियोजन करताना दहा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठा, राखीव साठ्यातील पाणी आणि कपातीनंतर बचत केलेला साठा याद्वारे पाणी वाचवून येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा राखून मुंबईकरांची पाण्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
[caption id="attachment_1020688" align="alignnone" width="442"]
water cut news[/caption]यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई : मुंबईत यंदा पावसाळ्यापूर्वी हाती ...
मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील चेंबूर परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची ...
तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे. त्याला मंजुरी प्राप्त होईल. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले तरी आतापर्यंत ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. ही कपात केल्यास मुंबईला १७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवले जावू शकते. परंतु सध्याचा उपलब्ध पाणी साठा ४ जुलैपर्यंतच पुरेल एवढा आहे. त्यामुळे येत्या १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.