रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि 'एनटीपीसी' यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे.


मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, 'एनटीपीसी'चे विभागीय कार्यकारी संचालक (वेस्टन रिजन) ई सत्या फानी कुमार, महाप्रबंधक (हायड्रो) मनमीत बेदी, एनटीपीसीचे (हायड्रो इंजिनिअरिंग) सहायक महाप्रबंधक डॉ. अनुभव, हायड्रो इंजिनिअरिंगचे उप महाप्रबंधक डॉ. प्रशांत पांडे, डॉ. अरबिंद कुमार, अपर महाप्रबंधक सूर्य प्रकाश केसरवानी, अंबा पीएसपीचे सागर धांडे आदि उपस्थित होते.


जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. कपूर व एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक श्री. ई. सत्या फानी कुमार यांनी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी श्री. कपूर यांनी कराराची माहिती दिली.


सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण २० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५९ सामंजस्य करार झाले आहेत. एनटीपीसी बरोबरचा हा राज्याचा एकूण ६० वा सामंजस्य करार आहे. या धोरणास अनुसरून ६० सामंजस्य करारांद्वारे ८२,०१५ मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता अपेक्षित असून याव्दारे रु. ४.२८ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर १.३१ लक्ष मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.


एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार


एनटीपीसी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे या उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेमध्ये ८०० मे.वॅ. ने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मूळ सामंजस्य करारात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. याअनुषंगाने एनटीपीसी लिमिटेड यांनी केलेली विनंती विचारात घेता मूळ सामंजस्य करारातील खालील नमूद उदंचन योजनांसाठी सुधारीत सामंजस्य करण्यात आला.


विकासकाचे नाव – एनटीपीसी


सामंजस्य कराराचा दिनांक - ०३ सप्टेंबर २०२४


सामंजस्य करारानुसार स्थापित क्षमता (मे.वॅ) - अंबा उदंचन जल विद्युत प्रकल्प - ८००


कुंभे उदंचन विद्युत प्रकल्प – १००० मे. वॅ.


पूरक पत्रानुसार सुधारित क्षमता अंबा प्रकल्प – १५०० मे.वॅ.


कुंभे प्रकल्प – ११०० मे.वॅ.


पूरक पत्रानुसार मे. वॅ क्षमतेत होणारी (वाढ/घट) -अंबा प्रकल्प - ७०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प - १०० मे.वॅ.


पूरक पत्रानुसार एकूण क्षमता वाढ (मे.वॅ.) - अंबा प्रकल्प - ८०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प – १०० मे.वॅ.


पूरकपत्रानुसार एकूण क्षमतेत वाढ- २६०० मे. वॅ.

Comments
Add Comment

धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर, तरुणानं संतापाच्या भरात प्रेयसीसह तिच्या आईला संपवलं

Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाने

10 वी पास दाम्पत्याचं कांड ऐकून तुम्हालांही बसेल धक्का, निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं आणि...

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात बीडमधील मुंडे दाम्पत्याकडून होत असलेल्या गर्भपात घटनेचा

Aakhri Sawaal : संजय दत्त यांच्या ‘आखरी सवाल’ मधील ‘नमस्ते सदा वत्सले’ या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ समोर, मातृभूमीप्रती समर्पणाचा दमदार आविष्कार!

मुंबई :  संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा सध्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे आणि प्रेक्षक त्याच्या

Jalgaon accident : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा दुर्दैवी अंत; वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon accident : जळगाव जिल्ह्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगावमध्ये (Dharangaon Accident News) एक अतिशय

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला

West Bengal : विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. या टप्प्यात राज्यातील १४२