Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला. अजित पवारांचा विमान अपघात झाला होता? की विमानाचा अपघात होण्यामागे कोणाचा हात होता का? याचे उत्तर अद्याप समोर आले नाही, परंतु अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते VSR कंपनीचे होते. या अपघातानंतर VSR कंपनीला विरोध करण्यात आला असला तरी त्याच विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केला अन् राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.



पवार कुटुंबाचं स्नेहभोजन


शरद पवार यांनी आपल्या पुण्यातील मोदी बाग येथील घरात पवार कुटुंबाच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता, यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. पार्थ पवार दिल्लीत राज्यसभेवर असल्याने ते या कार्यक्रमाला येतील की नाही? असे प्रश्न उपस्थित झाले होते.




पार्थ पवार यांचा स्पष्टीकरण


पार्थ पवार यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे, 'पुण्यात मोदी बागेत साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे होते त्यामुळे मी माझ्या कार्यलयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होत, शेवटच्या क्षणी आलेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation च्या कंपनीचं विमान बुक झालं. विमानतळावर पोहोचे पर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. असे पार्थ पवारांनी सांगितले




VSR कंपनीसोबत करार रद्द


या चुकीची गंभीर दखल घेतली जाणार असून विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द करत आहोत. तसेच कर्मचारी आणि सहकारी वर्गाकडून अशा चुका होऊ नयेत यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत


VSR कंपनीबद्दल असलेला रोष आणि विरोध हा कायम आहे आणि यापुढेही राहील, यावरून निर्माण झालेला वाद हा निरर्थक असून, इतरांनी सत्य परिस्थिती जाणून घेऊनच बोलावे असे पार्थ पवारांनी स्पष्ट केले आहे

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या