Ujjain Mahakal Stampede : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; नागचंद्रेश्वर दर्शनादरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती, १३ जण जखमी

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैन (Ujjain) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Malakaleshwar Temple) महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती. वर्षातून फक्त एकदाच उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराचे (Naagchandreshwar Temple) दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी रांग लावली होती. याच दरम्यान हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेड्स लावलेल्या भागात अचानक गर्दीचा ताण वाढला आणि तिथे धावपळ उडाली. या चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीमुळे अनेक भाविक खाली पडले, तर काहींना गुदमरल्यामुळे चक्कर आली. तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि नागरिकांनी त्वरित मदत करत जखमींना गर्दीतून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. स्थानिक सुत्रांनुसार या घटनेत १३ भाविक जखमी झाले आहेत.



वर्षातून एकदाच मिळणाऱ्या नागचंद्रेश्वर दर्शनासाठी ५.५ लाख भाविक उज्जैनमध्ये




श्रावणाचा तिसरा सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्यामुळे महाकाल आणि नागचंद्रेश्वर मंदिराच्या विशेष दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांचे लोट येत होते. वर्षातून केवळ एकदाच नागपंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले जातात, त्यामुळे या दर्शनाचे विशेष महत्त्व असते. एकाच दिवशी तब्बल ५.५ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.



मंदिरात कोणतीही अव्यवस्था नाही, प्रशासनाकडून चेंगराचेंगरीच्या बातम्यांचे खंडन


सोशल मीडिया आणि काही बातम्यांवरून मंदिरात गोंधळ आणि अव्यवस्था झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने हा दावा फेटाळून लावला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागपंचमी, सावन सोमवार आणि महाकाल देवाची पालखी (सवारी) हे तिन्ही सोहळे एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांची संख्या ६ लाखांच्या पार पोहोचली होती. गर्दी प्रचंड असली तरी वेगवेगळ्या मार्गांवरून सुलभ दर्शनाची आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन समितीने केले आहे.



वीज पसरल्याच्या अफवेमुळे निर्माण झाला गोंधळ


प्रत्यक्षात मंदिर परिसरात वीज प्रवाहित झाल्याची एक अफवा पसरली आणि त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. हरसिद्धी मंदिरासमोरील डीपीजवळ करंट आल्याची बातमी पसरताच लोकांनी सैरावैरा पळण्यास सुरुवात केली. यात काही लोक बॅरिकेड्सवर आदळले तर काही जण खाली पडले. नीलकंठ द्वाराजवळ काही भाविक घाबरून बॅरिकेड्सवरून पलीकडे उड्या मारतानाही दिसले. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही निव्वळ एक अफवा होती आणि भाविकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात