Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणाची आता विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले असून, येत्या १५ दिवसांत या प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी दिले.


विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या अनुषंगाने विधानभवनात आयोजित विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अमरावतीमध्ये गरिबांसाठी राखीव असलेले भूखंड धनदांडग्यांना किंवा अपात्र व्यक्तींना विकले गेल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. बैठकीदरम्यान महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनीही या प्रकरणात अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मान्य केले. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, केवळ प्रशासकीय चौकशी न करता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तपास होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक यंत्रणांचा समावेश असलेली समिती तातडीने स्थापन करावी, संपूर्ण चौकशी पूर्ण करून १५ दिवसांच्या आत अहवाल सभापतींना सादर करावा, चौकशीत जे अधिकारी किंवा व्यक्ती दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका