Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणाची आता विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले असून, येत्या १५ दिवसांत या प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी दिले.


विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या अनुषंगाने विधानभवनात आयोजित विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अमरावतीमध्ये गरिबांसाठी राखीव असलेले भूखंड धनदांडग्यांना किंवा अपात्र व्यक्तींना विकले गेल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. बैठकीदरम्यान महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनीही या प्रकरणात अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मान्य केले. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, केवळ प्रशासकीय चौकशी न करता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तपास होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक यंत्रणांचा समावेश असलेली समिती तातडीने स्थापन करावी, संपूर्ण चौकशी पूर्ण करून १५ दिवसांच्या आत अहवाल सभापतींना सादर करावा, चौकशीत जे अधिकारी किंवा व्यक्ती दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे