IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता


मुंबई : देशाच्या अनेक भागांमध्ये सतत वाढणारे तापमान आणि सरासरीपेक्षा जास्त उष्ण हवामान पाहता, पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना जारी केल्या आहेत.


ताज्या अध्ययनानुसार, वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांत कमाल तापमान सध्या 40°C ते 44°C च्या दरम्यान असून, श्री गंगानगर (राजस्थान) येथे सर्वाधिक 44.5°C तापमानाची नोंद झाली आहे. अनेक प्रदेशांमध्ये तापमानात सरासरीपेक्षा 5°C किंवा त्याहून अधिक वाढीची नोंद झाली आहे. ही बाब, देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेची काहिली वाढल्याची निदर्शक आहे.


येत्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगढ आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मध्य भारताच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. त्याच वेळी, किनारपट्टी आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीचे तापमान अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवाची काहिली आणि आरोग्यविषयक तक्रारी जाणवण्याचा धोका वाढू शकतो.


वायव्य भारतात 27 एप्रिल पर्यंत कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. तर मध्य आणि इतर भागांमध्ये या काळात तापमानात सुरुवातीला वाढ आणि त्यानंतर घट दिसून येऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


एकंदर परिस्थिती लक्षात घेता, उष्णतेच्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळणे, विशेषतः दुपारच्या वेळी पुरेसे पाणी पिणे, हलके आणि सुती कपडे घालणे आणि उच्च तापमानाच्या काळात घराबाहेरील कष्टाची कामे टाळणे यांचा समावेश आहे. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


उष्णतेशी संबंधित आजार, जसे की उष्णतेमुळे येणारा थकवा आणि उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर भारतीय हवामान विभागाने भर दिला आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.


विशेषतः खालील भागांमध्ये ही स्थिती असेल: वायव्य भारत (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश); मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ); दक्षिणेकडील निवडक प्रदेश (केरळ आणि माहे) याव्यतिरिक्त, ओदिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील प्रदेशांमध्ये रात्रीच्या वेळीही उष्ण वातावरण कायम राहू शकते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी जाणवणारा उष्म्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाच्या हंगामी अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 दरम्यान पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांत, तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे; यामुळे सध्या सुरू असलेल्या उष्ण हवामानाच्या वातावरणात, नियमित खबरदारी घेण्यासह उपाययोजनांची आवश्यकता प्रामुख्याने आहे.



भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबतची सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे अधिकृत संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/responsive/heatwave_guidance.php) जनतेच्या माहितीसाठी आणि प्रसारासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये, काय करावे आणि काय करू नये, पूर्वतयारीच्या उपाययोजना आणि विविध क्षेत्रांसाठीच्या विशेष सूचनांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश व्यक्ती, समुदाय आणि स्थानिक प्रशासनांना आरोग्याशी संबंधित धोके कमी करण्यात आणि उष्णतेच्या तीव्र परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वाढवण्यात मदत करणे हा आहे.


भारतीय हवामान विभाग तापमानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि वेळीच हवामानाचे अंदाज व इशारे जारी करत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकृत स्रोतांद्वारे अद्ययावत राहण्याचा आणि दिलेल्या सुरक्षा उपायांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा