IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता


मुंबई : देशाच्या अनेक भागांमध्ये सतत वाढणारे तापमान आणि सरासरीपेक्षा जास्त उष्ण हवामान पाहता, पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना जारी केल्या आहेत.


ताज्या अध्ययनानुसार, वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांत कमाल तापमान सध्या 40°C ते 44°C च्या दरम्यान असून, श्री गंगानगर (राजस्थान) येथे सर्वाधिक 44.5°C तापमानाची नोंद झाली आहे. अनेक प्रदेशांमध्ये तापमानात सरासरीपेक्षा 5°C किंवा त्याहून अधिक वाढीची नोंद झाली आहे. ही बाब, देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेची काहिली वाढल्याची निदर्शक आहे.


येत्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगढ आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मध्य भारताच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. त्याच वेळी, किनारपट्टी आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीचे तापमान अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवाची काहिली आणि आरोग्यविषयक तक्रारी जाणवण्याचा धोका वाढू शकतो.


वायव्य भारतात 27 एप्रिल पर्यंत कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. तर मध्य आणि इतर भागांमध्ये या काळात तापमानात सुरुवातीला वाढ आणि त्यानंतर घट दिसून येऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


एकंदर परिस्थिती लक्षात घेता, उष्णतेच्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळणे, विशेषतः दुपारच्या वेळी पुरेसे पाणी पिणे, हलके आणि सुती कपडे घालणे आणि उच्च तापमानाच्या काळात घराबाहेरील कष्टाची कामे टाळणे यांचा समावेश आहे. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


उष्णतेशी संबंधित आजार, जसे की उष्णतेमुळे येणारा थकवा आणि उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर भारतीय हवामान विभागाने भर दिला आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.


विशेषतः खालील भागांमध्ये ही स्थिती असेल: वायव्य भारत (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश); मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ); दक्षिणेकडील निवडक प्रदेश (केरळ आणि माहे) याव्यतिरिक्त, ओदिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील प्रदेशांमध्ये रात्रीच्या वेळीही उष्ण वातावरण कायम राहू शकते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी जाणवणारा उष्म्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाच्या हंगामी अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 दरम्यान पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांत, तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे; यामुळे सध्या सुरू असलेल्या उष्ण हवामानाच्या वातावरणात, नियमित खबरदारी घेण्यासह उपाययोजनांची आवश्यकता प्रामुख्याने आहे.



भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबतची सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे अधिकृत संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/responsive/heatwave_guidance.php) जनतेच्या माहितीसाठी आणि प्रसारासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये, काय करावे आणि काय करू नये, पूर्वतयारीच्या उपाययोजना आणि विविध क्षेत्रांसाठीच्या विशेष सूचनांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश व्यक्ती, समुदाय आणि स्थानिक प्रशासनांना आरोग्याशी संबंधित धोके कमी करण्यात आणि उष्णतेच्या तीव्र परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वाढवण्यात मदत करणे हा आहे.


भारतीय हवामान विभाग तापमानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि वेळीच हवामानाचे अंदाज व इशारे जारी करत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकृत स्रोतांद्वारे अद्ययावत राहण्याचा आणि दिलेल्या सुरक्षा उपायांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी