Devendra fadnavis : इतिहास आणि लोककथांमध्ये फरक - बागेश्वर बाबांच्या विधानावर फडणवीसांची भूमिका

- 'उबाठा'सोबतच्या 'गुप्त भेटी'चे वृत्तही फेटाळले


मुंबई : नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, इतिहास आणि लोककथा यांतील फरक ओळखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अधिकृत ऐतिहासिक संदर्भ आणि ग्रंथांमध्ये अशा कोणत्याही प्रसंगाचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एका प्रसंगाचा उल्लेख केला होता, ज्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास केला आहे, त्यात शास्त्री यांनी सांगितलेल्या घटनेचा कोणताही आधार सापडत नाही. त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांची मांडणी करताना अधिकृत संदर्भांचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सूचित केले.



दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात 'वर्षा' निवासस्थानी मध्यरात्री गुप्त भेट झाल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर मी ते उघडपणे करेन, आम्हाला लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत जे लपवून ठेवावे लागतील."

Comments
Add Comment

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता मुंबई : देशाच्या अनेक

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Assam Drugs News : आसाममध्ये सात कोटींची हेरॉईन जप्त; चार महिलांसह पाच जणांना अटक

आसाममधील कामरूप जिल्ह्यातील अमीनगाव येथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सुमारे ७ कोटी रुपयांच्या