Devendra fadnavis : इतिहास आणि लोककथांमध्ये फरक - बागेश्वर बाबांच्या विधानावर फडणवीसांची भूमिका

- 'उबाठा'सोबतच्या 'गुप्त भेटी'चे वृत्तही फेटाळले


मुंबई : नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, इतिहास आणि लोककथा यांतील फरक ओळखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अधिकृत ऐतिहासिक संदर्भ आणि ग्रंथांमध्ये अशा कोणत्याही प्रसंगाचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एका प्रसंगाचा उल्लेख केला होता, ज्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास केला आहे, त्यात शास्त्री यांनी सांगितलेल्या घटनेचा कोणताही आधार सापडत नाही. त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांची मांडणी करताना अधिकृत संदर्भांचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सूचित केले.



दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात 'वर्षा' निवासस्थानी मध्यरात्री गुप्त भेट झाल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर मी ते उघडपणे करेन, आम्हाला लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत जे लपवून ठेवावे लागतील."

Comments
Add Comment

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग