Mumbai : मुंबई महापालिकेच्यावतीने विद्यार्थीनींसाठी कांदिवलीत वसतीगृह

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे नोकरदार महिलांसाठी वसतीगृह सुरु करण्यात आल्यानंतर आता कांदिवली आकुर्ली गाव येथे विद्यार्थीनींसाठी वसतीगृह बांधण्यात आले आहे. तळ अधिक पाच मजल्यांच्या या इमारतीत १८ वर्षांवरील विद्यार्थीनींची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या वसतिगृहाची देखभाल आणि व्यवस्थापन राखण्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यां सस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.


कांदिवली पूर्व येथील आकुर्ली गाव येथे १६४२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर तळ अधिक पाच मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून ही इमारत महापालिकेच्या नियोजन विभागाच्या ताब्यात आल्याने आता याठिकाणी विद्यार्थींनींचे वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय घेता आहे. या वसतिगृहात १८ वर्षांवरील विद्यार्थींनींना प्रवेश दिला जाणार असून त्यांच्या निवासासाठी ४५ खोल्यांची रचना केली आहे. त्यामध्ये एकूण १३५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.


या मुलींचे वसतीगृह चालण्यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये चार संस्थांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेकडे विद्यार्थीनी वसतीगृह चालवण्याचा ११ वर्षांचा अधिकार आहे. या संस्थेच्यावतीने बेड, गाद्या, उशी, बेडशीट, चादर इत्यादी पुरवण्यात येणार आहे, याशिवाय जेवणाची सुविधा, विद्यार्थींनींना पुरवण्यात येणाऱ्या चांगल्या पोष्टिक जेवणाची काळजी घेतली जाणार आहे. या वसतीगृहातील मुलींना रोज सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण,व रात्रीचे जेवण यासाठी आवश्यक असलेले शुल्क संस्थेमार्फत आकारले जाणार आहे. वीज बिल, स्वच्छता संस्थेच्यावतीने केला जाईल आणि मालमत्ता कर महापालिकेच्यावतीने भरला जाणार आहे. सध्या या संस्थेची प्रथम ११ महिन्यांकरता नेमणूक करण्यात आली असून पुढील ११ महिन्यांकरता २० वेळा मुदतवाढ दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९