काळं सोनं संकटात ! होर्मुझमुळे इराण पहिल्यांदाच बॅकफूटला, नेमकं काय घडलं ?

अमेरिका, इस्रायलनं २८ फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले सुरु केले. आणि जगाची डोकेदुखी वाढली. या हल्ल्यामध्ये जगाला डोकेदुखी ठरणारा निर्णय इराणने घेतला. तो म्हणजे इराणने थेट होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली. यामुळे जगाला इंधन टंचाई आणि इंधन महागाईचा मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली. इराणसाठी ट्रम्प कार्ड ठरलेली होर्मुझची सामुद्रधुनी आता त्यांच्याचसाठी अडचणीची ठरु लागली आहे


अमेरिकेनं नौदलाच्या होर्मुझमधील नाकाबंदीचा सर्वाधिक फटका इराणलाच सध्या बसू लागला आहे. युद्ध सुरु झाल्यावर इराणला होर्मुझमुळे फरक पडला नव्हता. कारण इराणची आयात-निर्यात व्यवस्थित सुरु होती. उलट इराणची कमाई वाढली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीनं इराणची तेल संपन्नतादेखील धोक्यात आली आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीनं तेल निर्यात कमी झाली आहे.


आखाती देश मिळून जितकी आयात करतात, त्यातील ५० टक्के धान्य इराणला जातं. ही सगळी आयात होर्मुझमधूनच चालते. अमेरिकेनं नाकाबंदी लावत होर्मझमधून होणारी वाहतूक रोखल्यावर इराणनं बंदर अल खामेनीच्या जागी छाबहार बंदराचा वापर सुरु केला. पण छाबहारची क्षमता केवळ २० टक्के आहे. हीच अवस्था औषधांच्या पुरवठ्याचादेखील आहे.


सध्या इराणकडे तेल साठवायला जागा नसल्यानं इराणला नाईलाजानं तेल उत्पादन बंद करावं लागत आहे. अशाने तेल विहिरी बंद करण्याची नामुष्की इराणवर येईल. तेल विहिरी एकदा बंद केल्यावर त्या लगेच सुरु करता येत नाही. त्यातील दाब बिघडण्याचा धोका असतो. तेल खाली जाऊन पाणी वर येऊ शकतं. त्याला वॉटर कॉनिंग असं म्हणतात.तेलाची विहीर एकदा बंद केल्यावर ती सुरु करण्यासाठी बरीच मेहनत लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो. विहिरीतून पुन्हा आधी इतकंच उत्पादन काढता येईल याचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे इराणचं तेल उत्पादन घटण्याचा मोठा धोका आहे.


होर्मुझची सामुद्रधुनी इराणसाठी महत्त्वाची का ?


इराण सरकारला मिळणारा बहुतांश महसूल खनिज तेलातून येतो. इराणच्या मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये इराणच्या एकूण निर्यातीत खनिज तेलाचा वाटा ६५ ते ७५ टक्के इतका होता. यातील ९२ ते ९६ टक्के तेल वाहतूक होर्मुझमधून चालते. इराणची ९० टक्के तेल वाहतूक खार्ग बेटावरुन होते. याचा अर्थ होर्मुझशिवाय इराणला गत्यंतर नाही. इराणची आयातदेखील संकटात सापडली आहे. मध्य पूर्वेतील सगळ्यात मोठा धान्य आयात करणारा देश इराणच आहे. आखाती देश मिळून जितकी आयात करतात, त्यातील ५० टक्के धान्य इराणला जातं. ही सगळी आयात होर्मुझमधूनच चालते.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य