Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता कागल तालुक्यात एका कोल्ह्याने (Fox) नागरिकांची झोप उडवली आहे. बिबट्या, गवा आणि टस्करनंतर आता कोल्ह्याच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोल्ह्याने आतापर्यंत ११ जणांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.



कागल तालुक्यातील बोरवडे-मालवे परिसरातील मगदूम वसाहतीत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. संजय चव्हाण आणि त्यांची पत्नी घराजवळ काम करत असताना त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा शर्विल अंगणात खेळत होता. त्याचवेळी अचानक आलेल्या कोल्ह्याने शर्विलच्या उजव्या पायाचा चावा घेतला. हल्ल्यानंतर जखमी शर्विलला तातडीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्याच्यावर वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, हा कोल्हा केवळ मगदूम वसाहतीपुरता मर्यादित नसून मालवे आणि सरवडे परिसरातही फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या कोल्ह्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ११ जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करून या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा