Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. उन्हाच्या तडाख्यात आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे निघालेली ही बस स्टेशनजवळ येताच अचानक बंद पडली. त्यानंतर बसच्या खालच्या भागातून, विशेषतः इंजिन आणि डिझेल टाकीजवळून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. मात्र आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडत धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.





आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दलाला सहकार्य केले.



मात्र आग प्रचंड भडकलेली असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी बसचा फक्त सांगाडा उरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व प्रवाशांची हालचाल विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Chief Minister Devendra Fadnavis : मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार

मुंबई : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

FIFA2026 : फिफा विश्वचषक २०२६: मैदानावर भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा

FIFA World Cup 2026 : फुटबॉलच्या महाकुंभात, म्हणजेच २०२६ फिफा विश्वचषकात केवळ देशच एकमेकांविरुद्ध लढत नाहीत, तर विविध

Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य

Labor Minister Adv. Akash Fundkar : राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून

Minister Radhakrishna Vikhe-Patil : प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'मराठा आरक्षण कक्ष' स्थापन करणार

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील; न्यायमूर्ती शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई : मराठा आरक्षणाच्या