Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. उन्हाच्या तडाख्यात आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे निघालेली ही बस स्टेशनजवळ येताच अचानक बंद पडली. त्यानंतर बसच्या खालच्या भागातून, विशेषतः इंजिन आणि डिझेल टाकीजवळून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. मात्र आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडत धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.





आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दलाला सहकार्य केले.



मात्र आग प्रचंड भडकलेली असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी बसचा फक्त सांगाडा उरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व प्रवाशांची हालचाल विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment

Pune Crime : प्रियसीनेच केली प्रियकराची हत्या : धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे(pune) : पुण्यामध्ये एक धक्कादायक आणि विचीत्र असा प्रकार उघडकीस आला आहे . आजकालच्या जीवनात कोणावर विश्वास

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Rohit Sharma : रोहित शर्माला पद्मश्री तर टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा