लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ हा बंद झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, या महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी फक्त शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत.


लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (eKYC) करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत दिली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ देत याबाबत माहिती दिली होती.


लाडकी बहीण योजना
विधानसभा निवडणुकीआधी सरकारकरने लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. ज्या माध्यमातून गरजू महिलांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निधी जमा करण्यात येतो. या योजनेचा अनेक महिलांना लाभ होत आहे. तर ई-केवायसी (eKYC) च्या अडचणीमुळे अनेक गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. त्यामुळे ई-केवायसी (eKYC) साठी मुदतवाढ उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्याचे फक्त शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे.


लाडकी बहीण योजनेसाठी अटी (Ladki Bahin Yojana Eliibility Criteria)
लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा अडीच कोटी महिलांनी अर्ज घेतला होता. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला होता. अनेक महिला २१ ते ६५ वयोगटात बसत नव्हत्या. अनेक महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त होते त्यांचा लाभ बंद केला आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत. एकाच कुटुंबातील फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात.


बोगस लाडक्या बहिणी आणि भाऊ
लाडकी बहीण योजनेत अनेक टॅक्स भरणाऱ्या बड्या लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय काही पुरुषांनी तर कागदोपत्री महिला असल्याचं दाखवत योजनेचा गैरफायदा घेतला होता. राज्यात लाडक्या नसलेल्या या 12 हजार 757 पुरुषांनी सरकारला 22.96 कोटी रुपयांचा लाभ घेतला होता. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून 50 टक्के वसुली सुद्धा केली आहे.


फक्त आणि फक्त अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठीच असलेल्या या योजनेत भल्याभल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलं. या चुकीच्या प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी ई-केवायसीची संकल्पना अंमलात आणली गेली, आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून गेट-आऊट करण्याची योजना आखली.


अशी करा केवायसी
लाडक्या बहि‍णींनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीमधील चुका दुरुस्त करायच्या आहेत. यासाठी वेबसाइटवर पर्याय देण्यात आला आहे. यावेळी योग्य पर्याय निवडून त्यावर जाऊन तुम्हाला आधार आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं आहे. यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरायची आहे. त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. महिलांनी केवायसी केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल त्यानंतरच पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य