लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ हा बंद झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, या महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी फक्त शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत.


लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (eKYC) करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत दिली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ देत याबाबत माहिती दिली होती.


लाडकी बहीण योजना
विधानसभा निवडणुकीआधी सरकारकरने लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. ज्या माध्यमातून गरजू महिलांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निधी जमा करण्यात येतो. या योजनेचा अनेक महिलांना लाभ होत आहे. तर ई-केवायसी (eKYC) च्या अडचणीमुळे अनेक गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. त्यामुळे ई-केवायसी (eKYC) साठी मुदतवाढ उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्याचे फक्त शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे.


लाडकी बहीण योजनेसाठी अटी (Ladki Bahin Yojana Eliibility Criteria)
लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा अडीच कोटी महिलांनी अर्ज घेतला होता. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला होता. अनेक महिला २१ ते ६५ वयोगटात बसत नव्हत्या. अनेक महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त होते त्यांचा लाभ बंद केला आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत. एकाच कुटुंबातील फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात.


बोगस लाडक्या बहिणी आणि भाऊ
लाडकी बहीण योजनेत अनेक टॅक्स भरणाऱ्या बड्या लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय काही पुरुषांनी तर कागदोपत्री महिला असल्याचं दाखवत योजनेचा गैरफायदा घेतला होता. राज्यात लाडक्या नसलेल्या या 12 हजार 757 पुरुषांनी सरकारला 22.96 कोटी रुपयांचा लाभ घेतला होता. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून 50 टक्के वसुली सुद्धा केली आहे.


फक्त आणि फक्त अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठीच असलेल्या या योजनेत भल्याभल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलं. या चुकीच्या प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी ई-केवायसीची संकल्पना अंमलात आणली गेली, आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून गेट-आऊट करण्याची योजना आखली.


अशी करा केवायसी
लाडक्या बहि‍णींनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीमधील चुका दुरुस्त करायच्या आहेत. यासाठी वेबसाइटवर पर्याय देण्यात आला आहे. यावेळी योग्य पर्याय निवडून त्यावर जाऊन तुम्हाला आधार आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं आहे. यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरायची आहे. त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. महिलांनी केवायसी केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल त्यानंतरच पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त