CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभ


मुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'अर्बन नक्षलवादा'च्या माध्यमातून तरुणांच्या मनात संविधानाविरुद्ध विष पेरणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम 'युवाशक्ती जागर यात्रा' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राजव्यापी यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.


याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा अधिकृत प्रारंभ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्रात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के आहे. ही मोठी शक्ती जर संघटित होऊन एका दिशेने चालली, तर राज्यात मोठे परिवर्तन घडून येईल. मात्र, सध्या काही शक्ती युवकांमध्ये संविधानाविरुद्ध कलुषित मते पसरवत आहेत. या तरुणांना संविधानाने दिलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याची जबाबदारी युवा मोर्चा पार पाडेल."



महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. "संसदेत विरोधकांनी महिला आरक्षणाची जणू 'भ्रूणहत्या'च केली. जनगणना आणि पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) नावाखाली विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही त्यांची बुरसटलेली मानसिकता आहे. या यात्रेच्या माध्यमातून नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाईल," असेही फडणवीस यांनी नमूद केले.



यात्रेचे स्वरूप आणि उद्दिष्टे :



  • भाजयुमोची ‘युवाशक्ती जागर यात्रा' संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून शेतकरी, कामगार आणि आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय व सामाजिक प्रगल्भता येईल.

  • कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला राज्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या योजना गावखेड्यातील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

  • कृष्णराज महाडिक यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांचे आणि विद्यार्थी चळवळीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या यात्रेसाठी घेण्यात आले असून, राज्यातील संपूर्ण युवावर्ग या मोहिमेत जोडला जाईल.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : सहा बचावपटू, एक रणनीतिक चूक ज्यामुळे फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचा निकाल बदलला

अटलांटा: फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ असा थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत

Sanjay Raut Vitthal statement : विठ्ठलाचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांनी माफी मागावी; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : विठ्ठलाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा (BJP) प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव

Ahilyanagar : अखेर 'तो' पोलीस अंमलदार निलंबित, एसपी सुदर्शन यांची कठोर कारवाई

Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना नागरिकांसाठी डोकेदुखीच्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांशी उत्तम ट्युनिंग, आमच्यात विसंवाद नाही!

सुनील तटकरे; अर्थमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार मुंबई : "आमच्या पक्षात कुठलाही

Ukraine - Russia War : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाची सागरी वाहतूक विस्कळीत; अझोव समुद्रात तणाव वाढला

काळ्या समुद्रात रशिया आणि युक्रेनमधील सागरी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. १४-१५ जुलैच्या रात्री युक्रेनने

Nashik : जिल्हा परिषदेच्या शाळांतील गणवेश निकृष्ट दर्जाचे ; सीईओ ओमकार पवार अँ क्शन मोडमध्ये ; दिले 'हे' आदेश

Nashik : विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी आढळून आल्याचं जिल्ह्यात आढळून आल्याने प्रशासन