Bollywood Movies : ‘आखरी सवाल’चा पोस्टर रिलीज: संजय दत्त यांचा इंटेन्स अवतार ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई : निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त यांच्या निखिल नंदा मोशन पिक्चर्स बॅनरखाली बनलेला ‘आखरी सवाल’ हा चित्रपट दमदार स्टारकास्टसह सज्ज आहे. यात संजय दत्त, अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समिरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांची प्रमुख भूमिका आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरांग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला ‘आखरी सवाल’ हा 2026 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून समोर येत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने या उत्साहात आणखी भर घातली आहे. टीझरमधून मिळालेली झलक ही प्रभावी आणि विचार करायला लावणारी असून, हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असल्याचे संकेत मिळतात. तो काही अत्यंत चर्चित आणि वादग्रस्त विषयांना स्पर्श करतो.



आता चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित रिलीजपूर्वी निर्मात्यांनी एक प्रभावी नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त पुढच्या बाजूला बसलेले दिसतात, त्यांच्या मागे लोकांनी भरलेली एक खोली आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अधिकार आणि रहस्य जाणवते. विशेष म्हणजे त्यांच्या समोर “RSS – An Antinational Organisation” नावाचे पुस्तक दिसते, जे चित्रपटाच्या धाडसी कथानकाचा आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या, प्रभावी भूमिकेचा संकेत देते. हे दृश्य चित्रपटाच्या गंभीर आणि थरारक वातावरणाची झलक देत असून, विविध स्तरांवर उलगडणारी आणि वादग्रस्त विषयांवर भाष्य करणारी कथा दर्शवते.


पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले,
https://www.instagram.com/p/DXV6839jBWW/?igsh=MWE1dGw3Y3R2ZmszbQ==


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून असेही सूचित होते की चित्रपट भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांवर आधारित असेल, जसे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेला बंदी आदेश, बाबरी मशीद पाडण्याची घटना आणि महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग. हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एकाच्या प्रवासावर प्रकाश टाकत, त्याचा एक वेगळा दृष्टिकोन सादर करतो. विचार करायला लावणारे प्रश्न उपस्थित करत, हा चित्रपट प्रेक्षकांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सत्याच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करतो.



‘आखरी सवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरांग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, सहनिर्माते म्हणून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंग, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांचा सहभाग आहे. उत्कर्ष नैठाणी यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा